Coaching Beyond Book Controversy: विराट कोहलीसाठी सध्या महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) शिवाय दुसरा मोठा कोणी नाही. विराट अनेकदा धोनी आणि त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसला आहे, पण तुम्हाला माहित आहे का की हे मजबूत नाते एकेकाळी तुटू शकले असते. असाच खुलासा भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्या पुस्तकात (आर श्रीधर बुक कोचिंग बियॉंड) करण्यात आला आहे.

श्रीधर यांच्या पुस्तकानुसार, २०१६ मध्ये विराट कोहलीवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचे भूत बसले होते, तो कसोटीत कर्णधार बनला होता, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याला धोनीकडून कर्णधारपद हवे होते. यानंतर रवी शास्त्रींनी त्याचे आणि धोनीचे नाते तुटण्यापासून वाचवले.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Indias Champions Trophy 2025 matches General ticket sale date and timing Announced by ICC
Champions Trophy Tickets: चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी तिकीटं ३…
Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma Credits Suryakumar Yadav Hardik Pandya Axar Patel For his Fastest Century
IND vs ENG: “तिघांनीही मैदानावर आल्यावर मला…”, अभिषेक शर्माने भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंना दिलं शतकाचं श्रेय; सामन्यादरम्यान काय घडलं?
R Praggnanandhaa Defeats World Champions D Gukesh and Wins Tata Steel Chess Masters Title
TATA Steel Chess Masters: विश्वविजेत्या गुकेशचा जेतेपदानंतरचा पहिला पराभव, आर प्रज्ञानंदने पराभूत करत घडवला इतिहास
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”
Shivraj Rakshe Mahendra Gaikwad
पंचांशी हुज्जत, लाथ मारणं भोवलं! शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर कुस्तीगीर परिषदेची मोठी कारवाई
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
BCCI Announces 5 Crore Cash Prize For India U19 Womens Team for Winning T20 World Cup
U19 World Cup 2025: भारताच्या U19 मुलींचा विश्वविजेता संघ झाला मालामाल, BCCIने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस

श्रीधर यांनी आपल्या पुस्तकाच्या पान क्रमांक ४२ वर असे काही लिहिले आहे ,ज्यामुळे धोनी आणि कोहली यांच्यातील संबंधात दुरावा निर्माण होऊ शकला असता. पुस्तकात लिहिले, “२०१६ मध्ये एक काळ असा आला होता, जेव्हा विराट मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनण्यासाठी खूप उतावळा होता. त्याने काही अशा गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यावरून तो कर्णधारपदाच्या शोधात असल्याचे दिसून आले होते.”

धोनी आणि कोहली यांच्यातील कर्णधारपदाचा संघर्ष रवी शास्त्रीने संपवला –

हेही वाचा –Jay Shah Tweet: पृथ्वी शॉचे कौतुक करणे जय शाहांना पडले चांगलेच महागात; आता होत आहेत ट्रोल, जाणून घ्या कारण

श्रीधरने यांनी पुढे लिहिले, “एका संध्याकाळी, रवीने त्याला फोन केला आणि म्हणाला, ‘हे बघ विराट, एमएसने तुला कसोटी क्रिकेटमध्ये (कर्णधारपद) दिले. त्याचा आदर करायला हवा. जेव्हा योग्य वेळ असेल, तेव्हा तो तुला टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार पदाची संधी देईल. आता जोपर्यंत तू त्याचा आदर केला नाहीस, तर उद्या तू कर्णधार असशील तेव्हा तुला देखील तुझ्या संघाकडून सन्मान मिळणार नाही. आता काहीही झाले तरी त्याचा आदर करा. एक दिवस कर्णधारपद तुझ्याकडे येईल, तुला त्याच्या मागे धावण्याची गरज नाही.”

हेही वाचा – IND vs SL 2nd ODI: बॅकवर्ड पॉइंटवर अक्षर पटेल ठरला भारताची नवीन भिंत; टिपले तीन जबरदस्त झेल, पाहा VIDEO

अखेर विराटने रवी शास्त्रीचा हा सल्ला स्वीकारला. त्यानंतर वर्षभरातच त्याला मर्यादित षटकांचे कर्णधारपदही मिळाले. विराट कोहलीने जानेवारी २०१७ मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर २०२२ पर्यंत भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज केले. २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर विराटने टी२० कर्णधारपद आणि २०२२च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडले.

Story img Loader