Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka: अखेर आशिया चषक २०२३ची सांगता झाली. १९ दिवस चाललेल्या या स्पर्धेत १३ सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव ५० धावांवर आटोपला. भारताने ६.१ षटकात १० विकेट्स राखून सामना जिंकला. मात्र, सामन्यादरम्यान मोहम्मद सिराजने अशी काही कृती केली की भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला हसू अनावर झाले, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

श्रीलंकेविरुद्ध आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने जबरदस्त सुरुवात केली. मोहम्मद सिराज याने आपल्या स्पेलमधील दुसऱ्याच षटकात श्रीलंकेच्या एक-दोन नाही तर तब्बल चार विकेट्स घेतल्या. भारतासाठी सिराजचे हे प्रदर्शन अतिशय महत्वाचे आठरले. पण तरीही विराट कोहली आणि शुबमन गिल सिराजवर हसताना दिसले. त्याने संपूर्ण सामन्यात २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. तसेच, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेट्सचे अर्धशतक पूर्ण केले.

Champions Trophy 2025 Suresh Raina Prediction For Player of the Tournament prefers Shubman Gill
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सुरेश रैनाचं मोठं भाकीत! विराट-रोहित नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरणार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ranji Trophy 2025 Virat Kohli security 3 fan reached on ground during fielding at Arun Jaitley Stadium Delhi
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रणजी लढतीदरम्यान तीन चाहते घुसले मैदानात
Virat Kohli Clean Bowled on Ranji Trophy Return
Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीच्या पदरी रणजीतही निराशा! स्टंप्सच्या कोलांटउड्या, पाहा VIDEO
Ranji Trophy 2025 fan entered at Arun Jaitley Stadium ground to meet Virat Kohli during Delhi vs Railway match
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्याने भेदला सुरक्षा रक्षकांचा घेरा, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli play in Ranji Trophy 2025 crowd of fans gathering outside Arun Jaitley watching Virat video viral
Virat Kohli Ranji Trophy : विराटला १३ वर्षांनंतर रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी, अरुण जेटली स्टेडियमबाहेर लांबच लांब रांगा
Virat Kohli Hugs Childhood Friend Shawez Khan During Ranji Trophy Practice
Virat Kohli: “बाबा…विराट कोहली खरंच तुमचा मित्र आहे?”, विराटने दिल्लीत बालपणीच्या मित्राला पाहताच मारली मिठी; मित्राचा लेक झाला चकित
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल

भारताने आशिया चषक २०२३च्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावली. नाणेफेक जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार दासुन शनाका (०) याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण संघाची धावसंख्या १२ असताना श्रीलंकेच्या पहिल्या ६ विकेट्स गेल्या होत्या. यातील १० पैकी एकट्या मोहम्मद सिराज ६ विकेट्स घेतले. श्रीलंकेच्या डावातील चौथे षटक निर्णायक ठरले. या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता आणि चार विकेट्स घेतल्या.

हे षटक श्रीलंकेला सामन्यातून दूर घेऊन गेले. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर धनंजया डी सिल्वाने चौकार मारला. डी सिल्वाने मैदानात लेग साईडला हा शॉट खेळल्यामुळे चेंडू अडवण्यासाठी एकही खेळाडू उपस्थित नव्हता. कारण, विकेट्स पडत असल्याने ३ स्लिप आणि एक गली असे खेळाडू फलंदाजाच्या मागे झेल घेण्यासाठी उभे होते. त्यामुळे अशात सिराजने स्वतः हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला, पण चौकार गेला. चेंडू अडवण्यासाठी सिराज चक्क सीमारेषेपर्यंत धावला. गोलंदाज स्वतः चेंडू अडवण्यासाठी सीमारेषेपर्यंत धावण्याची ही बहुदा पहिली वेळ असू शकते. मैदानातील हे चित्र पाहून अनेकांना हसू आले. मैदानात उपस्थित विराट कोहली आणि शुमबन गिल यांनाही हसू रोखता आले नाही. विराट आणि गिल हसतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: IND vs SL, Asia Cup Final: भारताची ऐतिहासिक कामगिरी! सिराजच्या तुफानी गोलंदाजी पुढे श्रीलंकेचे लोटांगण, टीम इंडियाने आठव्यांदा आशिया कपवर कोरले नाव

सिराजचे पहिले पंचक म्हणजेच फाईव्ह विकेट हॉल

सिराजने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या. म्हणजे त्याने पहिल्यांदाच वन डेत पाच विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने १२ धावांत सहा विकेट्स गमावल्या होत्या. सहा विकेट्स गमावल्यानंतर वन डेमधली ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. त्याचवेळी श्रीलंकेने अवघ्या १२ धावांत पाच विकेट्स गमावल्याने एक नवा विक्रम भारताच्या नावावर झाला. फायनलमध्ये पाच विकेट्स गमावल्यानंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे.

Story img Loader