सध्या यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. सध्या सुपर-४ फेरीतील लढती सुरू असल्यामुळे प्रत्येक सामन्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. ४ सप्टेंबर रोजी झालेला भारत-पाकिस्तान सामना तर चांगलाच रोमहर्षक आणि थरारक ठरला. या सामन्यात भारताच पराभव झाला. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक झेल सोडल्यामुळे सामन्याची सर्वच गणितं बदलली. दरम्यान, याच कारणामुळे त्याच्यावर टीका होत आहे. मात्र भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याची पाठराखण केली आहे. अशा अटीतटीच्या सामन्यांत आणि दबावाखाली खेळताना चुका होत असतात, असे कोहली म्हणाला आहे.

हेही वाचा >>>IND vs PAK : ऋषभ अवघ्या १४ धावा करून परतला अन् कॅप्टन रोहित खवळला, लोकांनी पुन्हा घेतलं उर्वशी रौतेलाचं नाव

SL vs AUS Steve Smith becomes the 4th Australian to score 10000 runs in Test cricket at Galle
SL vs AUS : स्टीव्हन स्मिथचा मोठा पराक्रम! खाते उघडताच घडवला इतिहास; कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा ऑस्ट्रेलियन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Image Of Manoj Jarange And Prakash Ambedkar
Manoj Jarange : “आमच्यात वर्चस्वाची लढाई वगैरे…”, प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला जरांगे पाटलांचे थेट उत्तर
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Dabur sues Patanjali over advertising dispute concerning chyawanprash claims.
Chyawanprash : च्यवनप्राशची लढाई पोहचली उच्च न्यायालयात, पतंजलीच्या जाहिरातीवर डाबरने घेतला आक्षेप
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

विराट कोहलीने केली अर्शदीपची पाठराखण

“कोणाकडूनही चुका होऊ शकतात. भारत-पाकिस्तान सामन्यात खुप दबाव होता. मात्र या चुकांतून शिकणे गरजेचे आहे. तसेच या चुकांमधून धडा घेऊन पुढे वाटचाल करायची असते. सध्या भारतीय संघामध्ये खूप चांगले वातावरण आहे. जेव्हा काही चुका घडतात तेव्हा वरिष्ठ खेळाडू मार्गदर्शन करतात. खेळाडू चुकीतूनच शिकत असतात. चुकांमधून धडा घेऊन पुन्हा एकदा तशा परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाले पाहिजे,” असे विराट कोहली म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs PAK Asia Cup 2022 : दोनच चेंडू खेळला अन् कमाल केली, जे विराटला जमलं नाही ते बिश्नोईने केलं

सामन्यात नेमकं काय घडलं होतं?

४ सप्टेंबर रोजी भारत-पाक यांच्यातील सामन्यात १८ वे षटक सुरू असताना पाकिस्तानला ३४ धावांची गरज होती. यावेळी पाकिस्तानकडून खुशदील शाह आणि असिफ अली फलंदाजी करत होते. रवी बिश्नोईने टाकलेल्या चेंडूला असिफ अलीने टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत गेला त्यामुळे अर्शदीपला हा झेल टिपण्याची चांगली संधी होती. मात्र तो झेल टिपू शकला नाही. पुढे असिफ अलीला जीवदान मिळाल्यामुळे त्याने मोठे फटके लगावले. शेवटच्या दोन षटकांत भारतीय गोलंदाज पाकिस्तानी फलंदाजांना रोखू शकले नाही आणि संघाच्या काही चुकांमुळे भारताचा पराभव झाला.

Story img Loader