Virat Kohli Confession About Anushka Sharma: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीरोमँटिक लव्हस्टोरी बरीच गाजली होती. रिलेशन, ब्रेक अप, पुन्हा एकत्र येणं, कोणालाही कल्पना नसताना इटलीत केलेलं लग्न हा सगळा प्रवास फॅन्सनी पाहिला आहे. अनुष्का- विराटची लेक वामिकाचा जन्म झाल्यापासून हे कोहली कुटुंब खरोखरच गोंडस फॅमिली गोल्स देत आहे. पण अशातच आता विराट कोहलीने आपल्या लग्नातील एका रफ पॅच बद्दल खुलासा केला आहे. आपल्याकडून अनुष्कावर अन्याय झाल्याचे स्वतः कोहलीने कबुल केले आहे.

आपण सगळ्यांनीच पाहिले की, ३४ वर्षीय विराटने २०२२ च्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशविरुद्ध ११३ धावा केल्या होत्या. अवघ्या चार महिन्यात आशिया चषक, विश्वचषक आणि टेस्ट मध्ये विराटने शेवटची तीन शतक झळकावली होती. पण यापूर्वी २०१९ ते २०२२ हा काळ विराटसाठी खडतर होता.

Piyush Chawla response to Prithvi Shaw his retirement
Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Moin Khan father of Azam khan criticizes PCB Former Chief Ramiz Raja
‘फक्त एका सामन्यानंतर…’, मुलावर झालेल्या अन्यायासाठी मोईन खानने रमीझ राजाला धरले जबाबदार; म्हणाला, ‘त्याने युवा…’
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
father of rape victim change birth record to save accused
Jaipur Crime News : बाप नव्हे हैवान! बलात्कारी आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीची बदलली जन्मतारीख
Pimpri chinchwad, sexual assault, 14 year old girl, 14 Year Old Girl assault in Pimpri, Ravet Police station, Damini squad, arrest,
आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे
Crime Scene
Crime News : मध्यरात्रीत गळा चिरून पत्नीची हत्या, पण शेजारी झोपलेल्या मैत्रिणीला सुगावाही नाही लागला; पतीच्या कृत्यामुळे खळबळ!
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

२०१९ -२२ मध्ये विराटच्या आयुष्यात काय घडलं?

बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सहकारी सूर्यकुमार यादवशी बोलताना विराट म्हणाला की, “निराशा, नकारत्मकता यामुळे मी अगदीच विक्षिप्त वागू लागलो होतो. माझ्या वागणुकीचा अनुष्कावर परिणाम झाला हे एका अर्थी तिच्यासाठी अन्यायकारक आहे. जे तुमच्या पाठीशी उभे असतात त्यांना असे वागवणे योग्य नाही आणि मी त्या वागणुकीची जबाबदारी स्वीकारतो.

विराटने पुढे आपल्याच कमतरतेवरही भाष्य करत सांगितले की “मी माझ्या क्रिकेटपासून दूर होतो. माझी जवळची गोष्ट, माझी इच्छा सगळं काही माझ्या हातून निसटत होतं. तेव्हाच मला कळले की मी स्वतःपासून दूर राहू शकत नाही. मला स्वतःशी खरे असले पाहिजे. मी असुरक्षित असतानाही, मी चांगले खेळत नसतानाही, मी अगदी सर्वात वाईट खेळाडू ठरलो तरी मला ते स्वीकारावे लागेल. मी नाकारू शकत नाही,”

पुढे कोहली म्हणाला, “मी आता आनंदी आहे… गेल्या दोन वर्षांत माझी अशी सुरुवात झाली नव्हती. जेव्हा मी आशिया चषकात खेळलो, तेव्हा मी पुन्हा सरावाचा आनंद घेऊ लागलो, म्हणून मी म्हणेन की जर तुम्हाला थोडी निराशा वाटत असेल तर दोन पावले मागे जा, पण दुःख अमान्य करत राहिलात तर तुम्ही स्वतःपासून दूर जाल”

विराटने सूर्याला दिला मोठा सल्ला

या चर्चेत विराटने सूर्यकुमार यादवसाठीही खास सल्ला दिला, कोहली म्हणाला, “सूर्या कधीतरी तू पण हे अनुभवशील. तू चांगला खेळताना लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात.सूर्या बाहेर खेळायला गेला की लोक म्हणतील की सूर्या करणार. पण हा विश्वास आणि खेळ टिकवून ठेवणं कठीण असतं”

दरम्यान, विराटने ८७ चेंडूत ११३ धावांचे ४५ वे एकदिवसीय शतक झळकावून मंगळवारी सलामीच्या सामन्यात भारताला श्रीलंकेवर ६७ धावांनी विजय मिळवून दिला होता.