Virat Kohli has withdrawn his name from the first two matches : भारतीय संघाला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. गुरुवारपासून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या ३ दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.

विराटने नाव का मागे घेतले?

विराट कोहलीने आपले नाव का मागे घेतले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. विराटने वैयक्तिक कारणांमुळे नाव मागे घेतल्याचे बीसीसीआयने आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितले आहे. टीम इंडियाचा संघ फक्त पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर करण्यात आला होता. आता विराटच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. त्याचबरोबर तिसर्‍या कसोटीत विराट पुनरागमन करतो की नाही, हेही पाहावे लागेल.

Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Rahul Dravid son Samit included in team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली संधी
Gus Atkinson Hits First Century at No 8 and Broke Ajit Agarkar Record
Gus Atkinson Century: इंग्लंडच्या गस अ‍ॅटकिन्सने अजित आगरकरचा कित्ता गिरवला, पहिलं शतक झळकावत मोडला २२ वर्षे जुना विक्रम
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय
WTC Points Table ENG vs SL England big stride After 1st test of ENG vs SL Win by 5 Wickets
WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी?
Joe Root most test fifty record
ENG vs SL : जो रूटने एकाच डावात मोडले दोन मोठे रेकॉर्ड, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे

विराटची जागा कोण घेणार?

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे प्राधान्य असल्याचे विराटने सांगितले असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. पण सध्या तो अशा वैयक्तिक परिस्थितीत आहे की त्याला माघार घ्यावी लागली. या कारणास्तव तो पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर असेल. बोर्डाने मीडिया आणि चाहत्यांना विराटच्या गोपनीयतेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने अद्याप बदलीची घोषणा केलेली नाही. पण तिलक वर्माची रणजीमधील कामगिरी लक्षात घेता तो टीम इंडियात सामील होऊ शकतो.

हेही वाचा – IND vs ENG : ‘विराटचा अहंकार…’, माँटी पानेसरने किंग कोहलीला आऊट करण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना दिला गुरुमंत्र

पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान.