वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या क्रिकेट प्रसाशसकीय समितीची मुदत संपली आणि निवडणुकांनंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या हातात बीसीसीआयचं अध्यक्षपद आलं. सौरव गांगुली आल्यानंतरही बीसीसीआयच्या कारभारामध्ये काही बदल होतील अशी अनेकांना आशा होती. सुरुवातीला प्रशासकीय पातळीवर काही बदल दिसलेही. परंतू ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान रोहित शर्माच्या निवडीवरुन निर्माण झालेला संभ्रम आणि बीसीसीआयचं याप्रकरणी भूमिका स्पष्ट न करणं सगळं काही आलबेल नसल्याचं सांगून जातंय. रोहित शर्मासारख्या मोठ्या खेळाडूच्या निवडीवरुन एवढा वादंग झाल्यानंतरही बीसीसीआय समोर येऊन भूमिका स्पष्ट करणार नसेल तर खरंच आश्चर्य वाटायला हवं. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेलं बीसीसीआय संघातील घडामोडींबद्दल संवाद साधण्याची वेळ येते तेव्हा अगदीच मागासलेल्या बोर्डांप्रमाणे वागतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा