Five Reasons Of Team India Defeat In WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडच्या ओव्हल मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव झाला. टीम इंडियाला याआधीही डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, टीम इंडिया यावेळी किताब जिंकेल, अशी अशा चाहत्यांना होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला हा सामना जिंकण्यासाठी २८० धावांची आवश्यकता होती आणि संघाच्या हातात सात विकेट्स होत्या. परंतु, टीम इंडियाने एका पाठोपाठ एक विकेट्स गमावल्या आणि पहिल्याच सत्रात संघ २३४ धावांवर गारद झाला. अशातच टीम इंडियाने कोणत्या चुका केल्या? असा प्रश्न उपस्थित झाला असून आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.

खेळपट्टीचा अभ्यास करण्यात चूक झाली

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहितचा हा निर्णय चुकीचा ठरला. कारण ऊन पडल्याने खेळपट्टी पहिल्याच दिवसापासून फलंदाजीसाठी अनुकूल होती. रोहित आणि टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टीचं योग्य निरिक्षण करण्यात चूक झाली. कसोटी क्रिकेटमध्यो चौथ्या इनिंगमध्ये फलंदाजी करणं कठीण असतं. परंतु, रोहितने गोलंदाजी घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला. भारताचा इंग्लंडमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रेकॉर्डली खराब आहे. जेव्हा टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, अशा सामन्यांमध्ये संघाला ३८ सामन्यांपैकी २० सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

fritz sinner advance to final in 2024 us open
सिन्नेरचा अंतिम फेरीत प्रवेश ; उपांत्य लढतीत ड्रॅपरवर मात; अमेरिकेच्या फ्रिट्झचे आव्हान
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Duleep Trophy 2024 Who is Manav Suthar
Manav Suthar : दुलीप ट्रॉफीमध्ये ७ विकेट्स आणि ७ मेडन ओव्हर्स टाकणारा…कोण आहे मानव सुथार? जाणून घ्या
Duleep Trophy 2024 IND C vs IND D match highlights in marathi
Duleep Trophy 2024 : ऋतुराजच्या इंडिया सी संघाने मारली बाजी, श्रेयसच्या इंडिया डीचा ४ विकेट्सनी उडवला धुव्वा
Taylor Fritz and Frances Tiafoe of the United States in the men singles semifinals at the US Open sport news
फ्रिट्झची उपांत्य फेरीत धडक, टियाफोचे आव्हान; महिलांमध्ये नवारो-सबालेन्का एकमेकांसमोर
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
WTC Points Table ENG vs SL England big stride After 1st test of ENG vs SL Win by 5 Wickets
WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी?
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान

नक्की वाचा – WTC फायनलमध्ये भारताचा पराभव का झाला? कर्णधार रोहित शर्माने सांगितली यामागची सर्व कारणे, पत्रकार परिषदेत म्हणाला…

भारताचे दिग्गज फलंदाज झाले ढेर

ओव्हलच्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली. काही खेळाडू खराब शॉट खेळून माघारी परतले. अजिंक्य रहाणेला सोडलं तर इतर कोणत्याही फलंदाजाने कमाल केली नाही. त्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली. रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये ८९ धावा केल्या. तर दुसरीकडे शार्दूल ठाकूरने ५१ धावा आणि जडेजाने ४८ धावांची खेळी केली.

रविचंद्रन आश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय

रविचंद्रन आश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दरम्यान सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज राहिला आहे. परंतु, टीम मॅनेजमेंटने या चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्यात आश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आणि प्रशिक्षकाचा हा निर्णय चाहत्यांसह दिग्गजांना योग्य वाटला नाही. आश्विन डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्यातही माहीर आहे. परंतु, त्याला खेळापासून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ट्रेविस हेडचा झेल पडला महागात

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतक ठोकलं. ट्रेविस हेड पहिल्या इनिंगमध्ये शतकी खेळी न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला असता. परंतु, रहाणेनं त्याचा झेल ड्रॉप केला आणि टीम इंडियासाठी हे खूप महागात पडलं. कारण त्याने १६३ धावांची शतकी खेळी केली आणि पहिल्याच दिवशी टीम इंडियाला बॅकफूटला टाकलं. ट्रेविस हेडने या सामन्यात वेगानं धावा कुटल्या. पहिल्याच इनिंगमध्ये त्याने १७४ चेंडूत १६३ धावा कुटल्या.