१९९६चा वर्ल्डकप भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका अशा तीन देशांनी संयुक्त आयोजित केला होता. श्रीलंकेला पहिल्यांदाच आयोजनाचा मान मिळत होता. १२ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. अ गटात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, केनिया यांचा समावेश होता. ब गटात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, युएई आणि नेदरलँड्स यांचा समावेश होता.

वर्ल्डकप सुरू होण्याआधीच वादाला तोंड फुटलं होतं. सुरक्षिततेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघांनी श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. १९९६ साली तामीळ टायगर्सने राजधानी कोलंबोतील सेंट्रल बँकेत बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले

आणखी वाचा: Cricket World Cup: जेव्हा लिटील मास्टर सुनील गावसकरांची वर्ल्डकपमधली खेळी ठरली होती टीकेचं लक्ष्य

१५ फेब्रुवारीला वर्ल्डकपचे सामने सुरू होणार होते. ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेत १७ फेब्रुवारी रोजी तर वेस्ट इंडिजला २५ तारखेला खेळायचं होतं. याच्या दोन आठवडे आधी ३१ जानेवारीला श्रीलंकेची राजधानी कोलंबोला बॉम्बस्फोटाने हादरवलं. या हल्ल्याला श्रीलंकेतील यादवी युद्धाची पार्श्वभूमी होती. स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने बँकेत स्फोट घडवण्यात आला. एलटीटीईने घडवून आणलेल्या या स्फोटात ९१ जणांचा मृत्यू झाला तर १४०० हून अधिक जण जखमी झाले. स्फोटानंतर दहशतवादी आणि सुरक्षायंत्रणांमध्ये गोळीबारही झाला. हे सगळं नुकतंच घडून गेलेलं असल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघांना श्रीलंकेत खेळण्याबाबत साशंकता वाटली.

आणखी वाचा: Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो

आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज बोर्डाशी चर्चा केली. पण ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघ श्रीलंकेत न जाण्यावर ठाम राहिले. दोन्ही संघांनी श्रीलंकेत जाण्याला नकार दिल्याने श्रीलंकेला दोन्ही सामन्यांचे गुण देण्यात आले. यामुळे एकही सामना न खेळता श्रीलंकेचा उपउपांत्य फेरीत पोहोचला. गटवार लढतीत श्रीलंकेला पाच सामने खेळायचे होते. यापैकी दोन सामन्यांचे गुण त्यांना बहाल करण्यात आले. झिम्बाब्वे, केनिया आणि तुल्यबळ भारताला नमवत श्रीलंकेच्या संघाने एकही सामना न गमावता दमदार आगेकूच केली. झिम्बाब्वे आणि केनिया या दोन संघांचे श्रीलंकेतील सामने सुरळीतपणे पार पडले. आयसीसीने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांना श्रीलंकेत न खेळल्याबद्दल मोठा दंडही ठोठावला होता.

योगायोग म्हणजे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. पण लाहोर इथे झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम मुकाबल्यात श्रीलंकेसमोर ऑस्ट्रेलियाचंच आव्हान होतं. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत श्रीलंकेने विश्वविजेतेपदावर कब्जा केला.

Story img Loader