Pakistan’s Fan Trolls BCCI and India: भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना ओडिशामधील कटक येथे खेळवला गेला. कटकमधील बाराबती क्रिकेट स्टेडिमयवर भारतीय संघ तब्बल ६ वर्षांनी खेळण्यासाठी उतरला होता. भारताने या मैदानावर रोहित शर्माच्या शतकासह एक दणदणीत विजय मिळवत मालिकाही आपल्या नावे केली आहे. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानी चाहते आता बीसीसीआय आणि भारताला ट्रोल करत आहेत.

भारताच्या डावादरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यात फ्लडलाईट्स बंद झाल्याने सामना थांबवण्यात आला होता. फ्लडलाईट्स एकदा बंद झाल्यानंतर काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला. पण दुसऱ्यांद संपूर्ण फ्लडलाईट्स बंद झाल्या. यामुळे जवळपास ३५ मिनिटं सामना थांबवण्यात आला होता.

Crime News
Crime News : “तुझी बायको सुंदर आहे, वीज बिल कमी करायचं असेल तर तिला एकटीला…” ; अभियंत्याची शेतकऱ्याला ‘ऑफर’
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rohit Sharma Statement on India Win and His Century in Cuttack IND vs ENG 2nd ODI
IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?
Rohit Sharma furiously tells DJ to shut off music during IND Vs ENG 2ND ODI video goes viral
IND vs ENG: “बंद कर ए…”, रोहित शर्मा शतकी खेळीदरम्यान अचानक कोणावर संतापला? घातली शिवी; VIDEO व्हायरल
Rohit Sharma Statement on Trollers and His Form After Century at Cuttack BCCI Video
IND vs ENG: “मी हेच सांगत होतो यार…”, शतकानंतर बोलताना रोहित शर्मा भावुक, ट्रोलर्सना काय म्हणाला? BCCI ने video केला शेअर
CM Devendra Fadnavis Reaction on Ranveer Allahbadia Comment
रणवीर अलाहाबादियाच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “खूपच वाईट पद्धतीने…”
Virat Kohli Shakes Hand with Ball Boy in IND vs ENG Cuttack ODI Boy Left Awestruck Video Viral
IND vs ENG: विराटच्या कृतीने बॉल बॉय झाला अवाक्, सीमारेषेजवळ कोहलीने असं काही केलं की… VIDEO होतोय व्हायरल
mahakumbh traffic update
Mahakumbh Traffic: “जगातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम”, प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, भाविक तासनतास खोळंबले!

भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरूवात केली होती. भारतीय संघ ६ षटकांनंतर बिनबाद ४८ धावांवर खेळत होता. रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात होता, तर गिलनेही त्याला चांगली साथ दिली होती. पण फ्लडलाईट्सने व्यत्यय आणल्याने सामना थांबला. जवळपास ४५ हजार चाहते हा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. पण भारतीय मैदानांवर फ्लडलाईट्स बंद होणं ही घटना अगदी क्वचितच घडणारी आहे. पण कटकमध्ये घडलेल्या या घटनेचा फायदा पाकिस्तानच्या चाहत्यांनी घेतला असून त्यांनी बीसीसीआय आणि भारताला ट्रोल केलं आहे.

२ दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील तिरंगी मालिकेत न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र याला मैदानावर दुखापत झाली होती. त्याच्या या दुखापतीचं खापर गद्दफी स्टेडियममधील नव्या फ्लडलाईट्सवर फोडण्यात आलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीकरता या स्टेडियममध्ये नवे लाईट्स बसवण्यात आले आहेत. रचिन रवींद्र झेल पकडण्याच्या तयारीत होता पण तो चेंडू नीट पाहू शकला नाही आणि त्याच्या कपाळावर जाऊन बसला.

आता भारताचा त्यांच्या देशात फ्लडलाईट्समुळे सामना थांबल्याने पाकिस्तानी चाहत्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे. पाकिस्तानी चाहते म्हणाले, हे आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. कर्म, सर्व इथेच फेडायचं आहे. पाकिस्तानला वाईट बोलल्याने बाराबती स्टेडियममधील लाईट्स जात आहेत का, असा प्रश्न पाकिस्तानी चाहत्यांनी विचारला.

Story img Loader