India vs Sri Lanka, World Cup 2023: भारतीय संघ विश्वचषकातील त्यांचा सातवा सामना शेजारील देश श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गुरुवारी (२ नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईत पोहोचली आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माने एक फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरी म्हणून शेअर केला आहे. हे पाहून टीम इंडियाचे चाहतेही नाराज झाले आहेत. वास्तविक, भारतीय कर्णधाराने शेअर केलेल्या छायाचित्रात धुके दिसत आहे.

रोहित शर्माने विमानातून प्रवास करताना वरून हे छायाचित्र काढले आहे. त्याने लिहिले, ‘मुंबईत हे काय झाले?’ गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवामान चिंतेचे कारण बनले आहे. प्रदूषणामुळे लोक हैराण झाले आहेत. रोहित शर्मापूर्वी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटनेही चिंता व्यक्त केली होती.

India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
IND vs ENG Nitish Reddy Ruled out of England Series Rinku Singh Injured
IND vs ENG: भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडू संघाबाहेर; BCCI ने जाहीर केला सुधारित संघ
Shivaji park dust Mumbai
Shivaji Park Mumbai : एमपीसीबीकडून पुढील आठवड्यात शिवाजी पार्क धुळीचा आढावा
INDW beat SLW BY 60 Runs with third Consecutive Win in U19 T20 World Cup 2025
INDW vs SLW: भारताच्या लेकींनी वर्ल्डकपमध्ये नोंदवला सलग तिसरा विजय, श्रीलंकेचा मोठा पराभव; उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
India vs England 1st T20 Highlights in Marathi
IND vs ENG 1st T20 Highlights : अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ७ विकेट्सनी चारली धूळ, मालिकेत १-० ने घेतली आघाडी

वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील हवामान चिंतेचा विषय आहे. ‘सीपीसीबी’च्या मते, मंगळवारी सकाळी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १६१ वर होता, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. सर्वात खराब हवेची गुणवत्ता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागात नोंदवण्यात आली जिथे AQI पातळी २५७ वर पोहोचली. त्यानंतर सायन जिथे AQI २१८, वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसर (१९८) आणि कुलाब्यातील नेव्ही नगर (१८९) मध्ये नोंदवले गेले.

हेही वाचा: PAK vs BAN: शाहीन आफ्रिदीने रचला इतिहास! वन डे क्रिकेटमध्ये घेतल्या सर्वात जलद १०० विकेट्स, शमी-बुमराहलाही टाकले मागे

काय म्हणाला होता जो रूट?

या विश्वचषकात मुंबईच्या खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आश्चर्यचकित झालेला रोहित हा पहिला क्रिकेटर नाही. इंग्लंडच्या सामन्यांदरम्यान जो रूटनेही याबाबत तक्रार केली होती. तो म्हणाला, “मी याआधी कधीच अशा हवामानात खेळलो नाही. मी साहजिकच जास्त उष्ण वातावरणात आणि कदाचित जास्त दमट परिस्थितीत खेळलो आहे, पण तुम्हाला श्वास घेता येत नाही, असे कधी जाणवले नाही. ही माझी पहिलीच वेळ आहे, जिथे मला हा त्रास जाणवत आहे.”

या विश्वचषकात भारत अजिंक्य आहे

मुंबईचा सध्याचा हंगाम खरोखरच चिंतेचा विषय बनवणारा आहे. रोहितसारखा खेळाडू या परिस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहे. त्याने आपले सर्व क्रिकेट येथेच खेळले आहे. मात्र, विश्वचषकातील भारताच्या विजयात हवामान किंवा इतर कशाचाही अडथला येणार नाही, अशी आशा भारतीय कर्णधाराला वाटत आहे.

हेही वाचा: PAK vs BAN: शाहीन आफ्रिदी- मोहम्मद वसीमची भेदक गोलंदाजी! बांगलादेशने पाकिस्तानसमोर ठेवले २०५ धावांचे माफक आव्हान

भारताने या स्पर्धेत सहा पैकी सहा सामने जिंकले आहेत आणि आतापर्यंत अपराजित राहिलेला टीम इंडिया हा एकमेव संघ आहे. यात स्वतः रोहितने मोठी भूमिका बजावली आहे. तो आतापर्यंत सहा सामन्यांत ३९८ धावांसह भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. लखनऊच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याची ८७ धावांची खेळी हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

Story img Loader