World Cup 1983, India vs West Indies: १९८३ साल कोण विसरू शकेल, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली. अंतिम फेरीत वेस्ट इंडिज संघाचा भाग असलेल्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाने आता एका मुलाखतीत सांगितले की, “भारत नशिबाने अंतिम सामना जिंकला.”वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्सने १९८३चा विश्वचषक भारताने जिंकला कारण, त्यावेळी त्यांचे लक त्यांच्या बाजूने होते”, भारत भाग्यवान असल्याचे मत व्यक्त केले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील कमकुवत भारताने लॉर्ड्सवरील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिले विश्वविजेतेपद पटकावत इतिहास रचला. वर्ल्डकपच्या गेल्या दोन आवृत्त्या जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघही सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाचा दावेदार होता, पण भारताने शानदार कामगिरी केली.

भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या बाजूनेही लोक नव्हते, पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने इतिहास रचला. भारताचा संघ वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेसोबत एका गटात होता. भारताने तिन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी दोनदा सामने खेळले. अव्वल दोन मानांकित संघ उपांत्य फेरीत जाणार अशी संरचना होती. भारताने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. विश्वचषक स्पर्धेत विंडीज संघाचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती.

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप

मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला. भारताने झिम्बाब्वेला दोनदा तर ऑस्ट्रेलियाला एकदा पराभूत केले होते. अशा प्रकारे भारताने उपांत्य फेरी गाठली, जिथे भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि कमी धावसंख्येच्या अंतिम सामन्यात भारताने दोन वेळचा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज संघाला धूळ चारली. त्यांच्याकडे डेसमंड हेन्स, गॉर्डन ग्रीनिज, क्लाइव्ह लॉईड आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांसारखे दिग्गज फलंदाज होते.

हेही वाचा: Ajit Agarkar Salary: मुख्य निवडकर्त्याचे वेतन तीन पटीने वाढले, BCCI अजित आगरकरवर का आहे मेहरबान? जाणून घ्या

त्यावेळी भारत कमकुवत मानला जात होता

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९८३च्या विश्वचषकात भारत कमकुवत संघ म्हणून उतरला होता. विजेतेपदाच्या वाटेवर त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि त्यानंतर दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिजसारख्या अव्वल संघांना पराभूत करून जगाला चकित केले. १९८३च्या विश्वचषकात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामने खेळले गेले आणि भारताने अंतिम सामन्यासह दोन वेळा वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला. परंतु अँडी रॉबर्ट्स, जो त्या संघाचा भाग होता त्याला वेस्ट इंडिजच्या वेगवान आक्रमणाचा प्रमुख म्हटले जात होते. त्याने एवढ्या वर्षांनी सर्वांना अचंबित करणारे विधान केले. तो म्हणाला की, “वेस्ट इंडिजने स्पर्धा जिंकली असती असा मला अजूनही विश्वास वाटतो. मी स्पष्टपणे सांगतो माझ्याकडे जगातील सर्वोतम संघ होता. मात्र, जेतेपद पटकावण्यात भारतीय संघ भाग्यवान ठरला. त्यांना नशिबाने त्यादिवशी साथ दिली.”

वेस्ट इंडिजचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि संघाचे तत्कालीन सदस्य अँडी रॉबर्ट्स याने याबाबत वक्तव्य केले आहे. तो स्पोर्टस्टारशी बोलताना म्हणाला, “होय, आम्ही भारताकडून हरलो पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही काही सामने जिंकता आणि काही हरता. आम्ही नेहमी जिंकण्यासाठी खेळतो, परंतु प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगतो आम्हाला एका चांगल्या संघाकडून आम्ही पराभूत झालो नाही. क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला सामन्यादरम्यान सजग रहावे लागते. क्रिकेटकडे लोक नशिबाचा आणि संधीचा खेळ म्हणून पाहत नाहीत. १९८३ पर्यंत आम्ही विश्वचषकात एकही सामना गमावला नव्हता आणि १९८३ मध्ये आम्ही भारताकडून दोनदा हरलो.”

हेही वाचा: IPL 2024: आयपीएल २०२४मध्ये खेळण्यासाठी ‘हा’ पाकिस्तानचा खेळाडू ब्रिटिनचे नागरिकत्व घेणार? जाणून घ्या

टीम इंडिया नशिबाने जिंकली

तो पुढे म्हणाला, “आम्ही फॉर्ममध्ये होतो, पण खराब खेळामुळे त्या दिवशी आम्ही हरलो. हे १९८३ मध्ये भारताचे भाग्य होते. आमचा इतका मोठा संघ असूनही आम्ही १९८३ मध्ये दोन सामने हरलो आणि दोन्ही भारताविरुद्ध. त्यानंतर ५ किंवा ६ महिन्यांनी आम्ही भारताला ६-०ने हरवले. त्यामुळे, तो फक्त खेळ होता. १८०च्या जवळ आऊट झाल्यानंतर नशिबाने भारताला साथ दिली. तो भारताचा अतिआत्मविश्वास नव्हता.”  १९८३च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत १८३ धावांवर सर्वबाद झाला होता, त्यानंतर गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉयड सारख्या दिग्गजांचा संघ वेस्ट इंडिज ४३ धावांनी पराभूत झाला होता. मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी ३-३ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांची फळी उद्ध्वस्त केली.

Story img Loader