वृद्धिमान साहा मैदानावरील आपल्या शांत आणि संयमी खेळासाठी ओळखला जातो. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तो काहीनाकाही कारणामुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. याच दरम्यान, पत्रकार बोरिया मजुमदार यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप साहाने केला होता. शिवाय त्याने यासंदर्भातील सोशल मीडिया चॅटही प्रसिद्ध केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मजुमदारवर कारवाईदेखील केली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. आता सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असतानाच साहा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा संपल्यानंतर होणाऱ्या रणजी करंडक बाद फेरीतील सामन्यांपूर्वी त्याने बंगालचा संघ सोडण्याचे संकेत दिले आहेत. साहाने बुधवारी (२५ मे) रात्री संघाचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा