WTC Points Table Update After India Defeat IND vs NZ Test: भारत वि न्यूझीलंडमध्ये बेंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला आठ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत (WTC 2023-25) भारत अव्वल स्थानावर आहे. पण आता या पराभवानंतर भारताला मोठा फटका बसला असून टक्केवारीत घसरण झाली आहे. भारताने किवी संघाला १०७धावांचे लक्ष्य दिले होते आणि किवी संघाने २७.५ षटकांत ८ विकेट्स राखून ३६ वर्षांनी विजय मिळवला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. आता अंतिम फेरी गाठण्याचा मार्गही त्यांच्यासाठी कठीण झाला आहे.

न्यूझीलंडने १९८८ नंतर भारतात पहिला कसोटी विजय नोंदवला आहे. यासह, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील १२ कसोटींमध्ये भारताची टक्केवारी (पीसीटी) ७४.2२४ वरून ६८.०५ वर घसरली. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ६२.५ आहे आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या विजयासह न्यूझीलंडने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीत चालणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे हे तिसरे चक्र आहे. या तिसऱ्या चक्रात टीम इंडियाने आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान भारताने ८ सामने जिंकले आहेत तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

IND vs NZ New Zealand break 12-year record with 356 Runs lead Bengaluru Test
IND vs NZ: न्यूझीलंड संघ भारतावर पडला भारी, १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाने भारताविरुद्ध घेतली एवढी मोठी आघाडी
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
IND vs ENG 1st Test Match Updates in Marathi
IND vs NZ : बंगळुरु कसोटीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर! ५५ वर्षांनंतर भारताच्या पदरी नामुष्की
IND vs NZ Michael Vaughan Taunts India After 46 All Out in Bengaluru Test Indian Fans Gives Befitting Reply
IND vs NZ: “कमीत कमी भारत ३६…”, टीम इंडिया ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मायकेल वॉनने उडवली खिल्ली, भारतीय चाहत्यांनी ‘अशी’ केली बोलती बंद
PAK vs ENG Chris Woakes on Pakistan Team
PAK vs ENG : इंग्लंडच्या गोलंदाजाने विजयानंतर पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘आता खेळपट्टीत बदल केले जातील…’
New Zealand Captain Tom Latham Statement on Team India Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: “…तर आम्ही भारतावर विजय मिळवू”, भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने बनवली जबरदस्त रणनिती, हिटमॅन चक्रव्यूह भेदणार?
PAK vs ENG Shan Masood reaction after England beat Pakistan by an innings by 47 runs
PAK vs ENG : ‘आता सामना कसा फिनिश करायचा…’, इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार संतापला
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण

हेही वाचा – IND vs NZ: न्यूझीलंडचा टीम इंडियावर ऐतिहासिक विजय, किवी संघाने ३६ वर्षांनी पहिल्यांदाच भारतात जिंकला कसोटी सामना

न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी गमावल्यानंतर भारत WTC फायनलमध्ये कसा पोहोचणार?

भारताचे आता सात कसोटी सामने बाकी आहेत. न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच असे सात कसोटी सामने आता भारताला खेळायचे आहे. इतर निकालांची पर्वा न करता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला यापैकी पाच सामने जिंकावे लागतील. इतर निकाल भारताच्या बाजूने लागल्यास, भारत चार विजयांसह पुढील वर्षीच्या WTC अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो. म्हणजेच अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताचा मार्ग सोपा असणार नाही.

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेकने शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO

२४ ऑक्टोबरपासून पुण्यात भारताचा दुसरा कसोटी सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तिसरा कसोटी सामना १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पिंक बॉल टेस्टसह पाच कसोटी सामने खेळायचे आहेत.

WTC Points Table After IND vs NZ 1st Tet
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिका (IND vs NZ सामन्यानंतर)

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ती पहिल्या डावात ४६ धावांत ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. त्याचवेळी टीम इंडियाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ४६२ धावा केल्या. अशा स्थितीत टीम इंडियाने या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या २ गडी गमावून पूर्ण केले आणि ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला.