असं म्हटलं जातं, प्रत्येक जण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात अडखळतो, पडतो, आपटतो, तो किती लवकर त्यातून सावरतो ते महत्त्वाचं असतं. अपयशाचा सामना करताना झाल्या गोष्टीतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणे आणि नव्याने सुरुवात करणे आवश्यक असते. त्याकरता कुठल्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे, हे जाणून घेऊयात..
अपयशाला स्वीकारा..
’जे झाले ते स्वीकारा. निराशेचा पहिला धक्का बसल्यानंतर जे झालं ते स्वीकारण्यासाठी प्रयत्न करा. जर तुम्ही झाल्या गोष्टीबद्दल स्वत:ला अथवा इतरांना दोषी मानले किंवा झालेल्या गोष्टीला आपण महत्त्व देत नाही, किंवा ती घडलीच नाही, असा दृष्टिकोन बाळगला तर पुढे वाटचाल करणे कठीण होऊन बसते.
’दोष न देता, न्यायनिवाडा न करता किंवा स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत न पडता केवळ तथ्य गोष्टींना सामोरे जा. ती गोष्ट लिहून काढा किंवा विश्वासू व्यक्तीशी ही गोष्ट बोला. त्या प्रसंगात भावनिकरीत्या न गुंतलेल्या व्यक्तीचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणून घ्या. उदा. एखादं अपयशी ठरू शकणाऱ्या नात्याची चिन्हं जवळच्या मित्राला लवकर कळू शकतात.
’जी गोष्ट झाली त्याला ओलांडून जर तुम्ही पुढे वाटचाल करू शकत नसाल- त्यावर चर्चा करणं, परिणाम समजून न घेणं इत्यादी. तर कुठल्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत आहेत, ते ध्यानात घ्या. अपयशाबाबत जाणून घेण्यात तुम्ही कुठली भीती बाळगत आहात त्याकडे लक्ष पुरवा. ती भीती विनाकारण आहे किंवा अतिजास्त आहे ते जाणून घ्या. या अपयशामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि क्षमता यांवर आघात होईल याची काळजी करू नका.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा