आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या वेळी आधार गरजेचे नाही. मात्र दुसऱ्या वेळी लाभ घेताना ते अनिवार्य असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

जर आधार क्रमांक नसेल तर लाभार्थीने आधारसाठी नोंद केल्याची कागदपत्रे सादर करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे मुख्य कार्यकारी प्रमुख इंदू भूषण यांनी स्पष्ट केले. ‘आधार’च्या अंमलबजावणीची जबाबदारी या संस्थेकडे आहे. ‘आधार’ घटनात्मक वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याबाबत उपाययोजना केली जात आहे. तसेच या संदर्भात न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुष्मान योजनेचा लाभ पहिल्यांदा घेण्यासाठी आधार किंवा निवडणूक ओळखपत्र दाखवावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

Maratha reservation high court
मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार आता भूमिका मांडणार
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
bmc Nurses to go ahead with indefinite stir
मुंबई महापालिकेच्या सहाय्यक परिचारिका प्रसविका आंदोलनाच्या पवित्र्यात, २५ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
Abdul sattar
Video: आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने मंत्री अब्दुल सत्तार संतापले; बाजार समित्यांच्या परिषदेतून काढता पाय
Pune Crime News
Pune Crime : “पुण्यात विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराची घटना भयंकर, शाळा प्रशासन..”, सुशीबेन शाह यांनी काय म्हटलंय?
widow, pension, fine of one lakh, pension news,
निवृत्तीवेतनाकरता विधवेला वणवण करायला लावल्याने एक लाखाचा दंड

आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे नाव बदलून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असे करण्यात आले. २३ सप्टेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते झारखंडमधून त्याची सुरुवात करण्यात आली. योजना सुरू झाल्यापासून ४७ हजार जणांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजनेत याची गणना केली जाते. ९२ हजार जणांना गोल्ड कार्ड्स दिल्याचे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश अरोरा यांनी सांगितले. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच आहे. १० कोटी ७४ लाख गरीब कुटुंबांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. लाभार्थीना रोकडरहित व कागदरहित सेवा दिली जाणार आहे. योजनेतील ९८ टक्के लाभार्थी निश्चित असून, देशभरातील चौदाशे खासगी व सरकारी रुग्णालयांनी त्यासाठी नोंद केली आहे.