बडोद्यामधल्या खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे ती म्हणजे पाणीपुरीच्या विक्रीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. बडोद्यात गोलगप्पा नावानं ओळखल्या जाणाऱ्या पाणीपुरीवर सध्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा शिक्का मारत महापालिकेनं बंदी घातली आहे. पाणीपुरी बनवण्याची पद्धत आरोग्याला हानीकारक असल्याचा निष्कर्ष पालिकेनं काढला आहे.

पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. याच कालावधीच विविध रोगांच्या साथी फैलावतात आणि त्या नंतर पालिकांसाठी डोकेदुखी बनतात. सध्या ज्या प्रकारे पाणीपुरी बनवल्या जातात ते बघितलं तर या वातावरणात टायफॉइड, कावीळ व विषबाधेमुळे होणारे रोग बळावतील त्यामुळे सध्या पाणीपुरीच्या विक्रीला बंदी घालत असल्याचं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे.

pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Mumbai Municipal Corporation,
मुंबई : लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी अद्याप ‘जैसे थे’, प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय अर्ज करता येत नसल्याने अनेक उमेदवार वंचित
Market Licensing Department, illegal meat sellers,
कल्याणमध्ये अवैध मांस विक्रेत्यांवर बाजार परवाना विभागाची कारवाई
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
What is the reason for the obstructions in the Pimpri to Nigdi Metro route Pune
पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गात अडथळा, काय आहे कारण?
Laborer murdered, Solapur, Laborer,
सोलापूर : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून

पाणीपुरी विकण्यात येणाऱ्या अनेक गाड्यांवर, दुकानांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले व त्यांना अत्यंत अपायकारक पद्धतीनं पाणीपुरी बनवलं जात असल्याचं आढळलं, असं सांगण्यात आलं आहे. पालिकेच्या आरोग्यविभागानं यावेळी जप्त केलेलं हजारो किलोंचं सामान फेकून दिलं आहे. खराब झालेलं पीठ, सडलेले बटाटे, घाणेरडं तेल व दुर्गंधीयुक्त पाणी यांचा यात समावेश आहे. शहरभरातल्या छाप्यांमध्ये 50 जागांची कसून तपासणी केली असता हे वास्तव समोर आलं आहे.  सगळ्या प्रकारच्या खाद्यविक्रेत्यांनी पावसाळा संपेपर्यंत पाणीपुरी विकू नये असा आदेश पालिका प्रशासनानं काढला आहे.