Home Remedies: अनेकदा लोक पायांना तीव्र खाज सुटते आणि जळजळ होते आणि वेळोवेळी खाज खूप तीव्र होते, ज्यामुळे खूप त्रास होतो. या समस्येमुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागते. वास्तविक, यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात, जसे की शरीरात पाण्याची कमतरता, पायांमध्ये रक्ताभिसरण वाढणे, काही प्रकारची ऍलर्जी किंवा मधुमेह इत्यादी. बर्‍याच वेळा ही समस्या अधूनमधून उद्भवते, परंतु जर पायांच्या तळव्यांची आग होत असेल किंवा तीव्र खाज सुटत असेल किंवा अवेळी उद्भवली असेल तर काय करावे हे समजत नाही अशावेळी काही सोपे उपाय करून तुम्ही पायात जळजळ होण्याची समस्या कमी करू शकता.

सैंधव मीठ
सैंधव मीठाचे पाणी तळपायांच्या होणाऱ्या आगीपासून आराम देण्यास मदत करते. हे रक्ताभिसरण सुधारते आणि जळजळ आणि वेदना कमी करते. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात. किचनमध्ये सैंधव मीठ सहज उपलब्ध आहे. या उपायाचा वापर करताच पहा तुमच्या पायाची आग नाहीशी होईल. सैंधव मीठ पाण्यात मिसळून प्यायल्याने तळव्यांची खाज आणि आग दोन्ही दूर होते.

mugdha vaishampayan make ukadiche modak video viral
Video : मुग्धा वैशंपायनने सासुरवाडीत बनवले उकडीचे मोदक! वैशाली सामंतच्या ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाली…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
venus transit in kanya
२६ दिवस शुक्रदेव देणार पैसाच पैसा! ४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? राशी परिवर्तन होताच दारी नांदणार लक्ष्मी
Shani transit 2024 Next 216 days earn money
पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय
Rajiv mishra on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: “आम्ही फक्त सहा फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती, पण…”, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रांचे मोठे विधान
forecast of the Meteorological Department there is a possibility of heavy rain in some parts of Maharashtra Nagpur
राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खाते…
hot water laundry tips 4 types of clothes you should not wash with hot water
कितीही थंडी असो, ‘या’ चार प्रकारचे कपडे गरम पाण्यात धुण्याची चूक करू नका, नाही तर…

दही
तळव्यांची आग कमी करण्यासाठी दही खूप प्रभावी आहे. वास्तविक, दह्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे पायाला होणार संसर्ग कमी होतो. तर दह्याचा कूलिंग इफेक्ट असतो. अशा परिस्थितीत, ते केवळ तुमच्या खाज येणाऱ्या तळव्यांना थंडवा देतो आणि त्यांना कोमल करण्यास मदत करतो. दही खाल्ल्याने तळव्यांना होणारी खाजही कमी होते.

हेही वाचा – रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणानंतर बीट का खाल्ले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

कोरफड
पायांना तीव्र खाज येत असेल तर कोरफडीचा गर पायांवर लावावा. यामुळे तुमच्या पायात थंडावा जाणवेल.

मॉइश्चरायझर
पायात तीव्र खाज येत असेल तर पाय चांगले धुवावेत. धुतल्यानंतर त्यावर थोडे मॉइश्चरायझर लावावे.

खोबरेल तेल
तुम्ही तुमच्या पायाला खोबरेल तेल देखील लावू शकता, ते लावल्याने तुम्हाला आराम मिळेल. पाय धुतल्यानंतरही खोबरेल तेल लावा.

हेही वाचा – तुमच्या महागड्या सिल्क साड्यांचा रंग जातोय? मग या सोप्या टिप्स वापरून पाहा, येईल नव्यासारखी चमक

ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर पायांची होणारी आग दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे संसर्ग कमी होते. हे तळव्यामध्ये रक्ताभिसरण देखील सुधारते.

बर्फाचे पाणी
तळव्यामध्ये जळजळ कमी करण्यासाठी बर्फाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. त्यात किमान १५ मिनिटे पाय ठेवा. तुम्हाला तात्काळ आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर बर्फाच्या पाण्यात पाय ठेवू नका. उन्हाळ्यात बर्फ घरी किंवा बाजारात सहज उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत, या चार उपायांचा अवलंब करून, तुम्ही काही मिनिटांत तुमच्या तळव्यातील आग दूर करू शकता.