उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात लम्पी विषाणूचा कहर सातत्याने वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्याचा थेट परिणाम गायीच्या दुधावर आणि उत्पादनावरही दिसून येत आहे. आतापर्यंत, लम्पी विषाणू उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे, त्याचा सर्वाधिक प्रभाव मुझफ्फरनगर, सहारनपूर आणि अलीगढमध्ये दिसून येत आहे. राज्यात १५ लाखांहून अधिक गुरेढोरे याच्या विळख्यात आले असून, त्यापैकी २५ हजारांना थेट लागण झाली आहे.

लम्पी व्हायरसचा संसर्ग गायीच्या जीवनासाठी धोकादायक आहे. यासोबतच गाईचे दूध आणि गोमूत्र आणि शेणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. या संदर्भात आज तकने लखनौ विभागाचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी आणि तज्ञ अरविंद कुमार वर्मा यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार गाईच्या दुधात लम्पी व्हायरसचा प्रभाव दिसून येतो आणि दुधातही विषाणूचे घटक आढळतात असे स्पष्ट झाले आहे.

(हे ही वाचा: Weight Control Tips: थायरॉईडमुळे फक्त वजनच वाढत नाही तर ‘हे’ ६ गंभीर आजारही होऊ शकतात; जाणून घ्या नियंत्रणासाठी टिप्स)

दूध जास्त वेळ उकळावे लागते

गाईच्या दुधात असलेले विषाणू देखील दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळणे आवश्यक आहे अन्यथा पाश्चरायझेशनद्वारे वापरले जाणारे दूध कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही, कारण ते विषाणू पूर्णपणे नष्ट करते. त्यामध्ये मानवासाठी कोणतेही हानिकारक पदार्थ उरलेले नसतात. परंतु हे दूध जर गाईच्या वासराने पिले तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत गुरांचे वासरू वेगळे करावे.

लम्पी विषाणूचा गुरांच्या गर्भाशयावरही परिणाम होतो

दुसरीकडे, लम्पी विषाणूमुळे गायीचा मृत्यूदर कमी असला तरी त्याचा थेट परिणाम तिच्या दूध उत्पादनावर आणि गर्भाशयावर होतो. तज्ञांच्या मते, हा रोग दुधाच्या उत्पादनावर परिणाम करतो, जे ५० टक्क्यांनी कमी होते. हा आजार आर्थिक नुकसानीचा आजार आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण १ ते २ टक्के आहे. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर आणि गुरांच्या गर्भाशयावर होतो, ज्यामुळे गाईची गर्भधारणाही संपुष्टात येते.

( हे ही वाचा: Kidney Damage Symptoms: सावधान, किडनी फेल होण्याआधी शरीर देतं ‘हे’ ८ भयंकर संकेत, वेळीच ओळखा नाहीतर…!)

संक्रमित गायीची लाळ आणि रक्त तुम्हाला आजारी बनवू शकते

दुसरीकडे, लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की लम्पी व्हायरसने ग्रस्त असलेल्या गायीच्या गोमूत्र आणि शेणात विषाणूचे घटक आढळत नाहीत का? यावर तज्ञांचे मत आहे की, विषाणूचा कोणताही प्रभाव दिसत नाही. तसेच, जे लोक काम करतात किंवा गोमूत्र किंवा शेण वापरतात त्यांच्यावर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत, परंतु ते या विषाणूचे वाहक बनणार नाहीत याकडे लक्ष ठेवा, कारण गायीच्या लाळेला किंवा तिच्या संक्रमित रक्ताला दुसऱ्या प्राण्याने स्पर्श केल्यास, नंतर संसर्ग होऊ शकतो. पसरू शकतो.

लम्पी व्हायरस मानवांना धोका देत नाही

लम्पी विषाणूचा मानवांना कोणताही धोका नाही, तो प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये पसरतो. अशा स्थितीत जनावरांची लाळ आणि डास चावल्याने त्याचा प्रसार होतो. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जनावरांच्या जखमांना कडुलिंब किंवा हळद आणि तुपाची पेस्ट लावून बरे केले जाऊ शकते. आणि या आजाराने ग्रस्त गुरे १ आठवडा ते १० दिवसांत बरी होऊ शकतात, परंतु यापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय आहे ती म्हणजे लसीकरण. ज्याद्वारे त्याचे संक्रमण वेगाने थांबवता येते.

Story img Loader