Disease in Monsoon: सध्या पाऊस जोमात सुरू आहे. पावसाळा म्हटलं की अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. पावसाळ्यात आजारी पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. या ऋतूमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. त्याचबरोबर या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया फोफावतात, त्यामुळे आहारात खूप काळजी घेण्याची गरज असते. यावेळी चांगला सकस आहार खावा असं सांगण्यात येत. या ऋतूत थोडासा निष्काळजीपणा देखील तुमच्यासाठी समस्या वाढवू शकतो. हवामानातील ओलावा आणि प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. याशिवाय पचनसंस्था देखील कमकुवत असते ,अशा स्थितीत जेवणात थोडेसे कमी पडल्यास पोटदुखी, संसर्ग, जुलाब, अन्नातून विषबाधा आदी समस्या उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त या ऋतूमध्ये असे अनेक आजार पसरतात, ज्यामुळे व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा काही आजारांबद्दल ज्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

इन्फ्लुएंझा

पावसाळ्यात इन्फ्लूएंझा प्रादुर्भावाच्या तक्रारी वाढतात. याचे विषाणू हवेद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि तुमच्या पवननलिका आणि घशावर परिणाम करतात. यादरम्यान अति थकवा, कफ, घसा आणि शरीरात दुखणे, डोकेदुखी, छातीत दाब आणि त्वचेचा रंग निळा पडणे आदी समस्या उद्भवतात. अशी कोणतीही समस्या दिसल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या. नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

Riding a bike in cold
थंडीच्या दिवसात बाईक रायडिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची घ्या विशेष काळजी
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Orbito tripsy treatment of 86 year old man with heart problem was successful Pune news
हृदयविकारावर ८६ वर्षीय वृद्धाची मात! ऑरबिटो-ट्रिप्सी उपचार प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Natural Ways To Dissolve Gall bladder Stones
पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
risk of heart disease is increasing at a young age
कमी वयातच हृदयविकाराचा वाढतोय धोका! तो कसा ओळखावा जाणून घ्या…
ST employees and officers
बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…

( हे ही वाचा: पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया झपाट्याने पसरतो; अशाप्रकारे काळजी घ्या)

टायफॉयड

टायफॉइड ही देखील पावसाळ्यात लवकर उद्भवणारी समस्या आहे. याला साल्मोनेला बॅक्टेरिया जबाबदार असल्याचे मानले जाते. ही समस्या दूषित पाणी आणि अन्नामुळे होऊ शकते. याची तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणे आहेत. जर तुम्हाला अशी काही समस्या असेल तर अजिबात निष्काळजी न होता त्यावर योग्य उपचार करा. टायफॉइड टाळण्यासाठी या ऋतूत बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळा.

कॉलरा

दूषित पाणी प्यायल्यानेही कॉलरा आजार होतो. पावसात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे त्याची प्रकरणे वाढतात. या आजारा दरम्यान, अतिसार, उलट्या, डिहायड्रेशन आणि क्रॅम्प्सची समस्या असू शकते. हे त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न आणि दूषित पाणी पिणे टाळा. पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून प्यावे.

( हे ही वाचा: वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने ‘या’ ५ चाचण्या करायला हव्यात; जाणून घ्या माहिती)

डेंग्यू-मलेरिया

या मोसमात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आदींचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तीव्र ताप, अंगदुखी आणि अशक्तपणा ही त्याची लक्षणे असू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी, घाण पाणी आजूबाजूला जमा होऊ देऊ नका. कूलर वेळोवेळी स्वच्छ करा. मच्छरदाणी लावून झोपा. असं केल्याने डास येणार नाहीत.