आयुर्वेदात कडुलिंब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कडुलिंब चवीला कडू असला तरी त्याच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. शिवाय कडुलिंब कुठेही आणि सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास शरीरातील निम्मे आजार बरे होऊ शकतात. तर रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे काय फायदे आहेत याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे फायदे –

CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
maharashtra assembly election quiz
Election Quiz: आज स्मार्टफोन जिंकण्याची अखेरची संधी, द्या निवडक प्रश्नांची उत्तरं आणि जिंका आकर्षक बक्षिसं!
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Psoriasis Skin Disease Symptoms
Psoriasis Skin Disease: त्वचेवर सतत लाल चट्टे येतात? पित्त नव्हे तर असू शकतात ‘या’ गंभीर रोगाची लक्षणे
Which Medicine Tablets To Take reduce Acidity First Remedies To Detox Body And Remove Pitta Health Expert Advice
पित्त झाल्यास लगेच कोणती गोळी घ्यावी? डॉक्टरांनी सांगितले, सर्वात आधी घरी काय उपचार करता येईल
ankita walawalkar aka kokan hearted girl replied to netizen
“गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’
Why drink milk while standing and water while sitting?
उभे राहून दूध आणि बसून पाणी का प्यावे? जाणून घ्या आयुर्वेदाचे नियम काय सांगतात

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते

खराब जीवनशैलीमुळे भारतात दिवसेंदिवस मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय आजही अनेक लोक घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात. यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे. या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.

रक्त शुद्ध ठेवणे

कडुलिंबात असे काही औषधी गुणधर्म आहेत, जे शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. ते रक्तातील विष बाहेर काढून रक्त डिटॉक्स करतात. तसेच जर तुमचे रक्त स्वच्छ असेल तर तुम्हाला कोणताही आजार होऊ शकते नाही.

हेही वाचा – महिनाभर कॉफी सोडल्यास त्याचे शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात 

पोटासाठी फायदेशीर

कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटीमध्ये खूप उपयुक्त आहेत आणि कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आम्लपित्त आणि पोटदुखीपासून आराम मिळू शकतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. एवढेच नाही तर सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो.

अशी वापरा कडुनिंबाची पाने

साधारणपणे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस पिला जातो. कडुलिंबाच्या ताज्या पानांचा रस नेहमी सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास कडुनिंबाची पाने तव्यावर कोरडी भाजून हाताने मॅश करून त्यात लसूण आणि मोहरीचे तेल घालून भातासोबत खाऊ शकता.

कडुलिंबाच्या पानांचे सेवन करताना ही खबरदारी घ्या

एकावेळी खूप कडुलिंबाची पाने खाऊ नका. कडुलिंबाची पाने जितकी जास्त खावीत तितके चांगले पोषण मिळेल असे अनेकांना वाटते. मात्र, या पानांचे केवळ गरजेपुरते आणि प्रमाणात सेवन करा.

(टीप – वरील माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कडुलिंबाची पाने सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ).

Story img Loader