Unhealthy Snacking Habit At Night : वातावरणात जसजसा बदल होतो तसतसा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जास्त तर थंडीतून आपल्याला अनेकदा सर्दी-खोकला वारंवार होत असतो. मग कितीही औषधे किंवा डॉक्टरकडे गेलो तरीही तो काही केल्या कमी होत नाही, त्यामुळे जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि आजारी पडणे टाळायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची काळजीसुद्धा घ्यावी लागेल.सक्रिय जीवनशैली, चांगले अन्न आणि काही गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन तुम्ही सहजपणे दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकता आणि आजारी पडणे टाळू शकता. तर निरोगी जीवन जगण्याच्या तुमच्या इच्छेवर तुमच्या पोषणाचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. पौष्टिक आहार घेतल्याशिवाय तुम्ही कधीही निरोगी जीवन जगू शकत नाही. याव्यतिरिक्त तुम्ही काय आणि केव्हा सेवन करता याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण आपण कुठलाही विचार न करता सकाळी, दुपारी, संध्याकाळी पाहिजे तसे अन्नपदार्थ खातो (Foods To Avoid At Night) . तर आज आम्ही अशा काही पदार्थांवर चर्चा करू, ज्या रात्री खाल्ल्यास शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थंड पदार्थ :

तुमच्या रात्रीच्या आहारात किंवा रात्री झोपण्यापूर्वी थंडी जाणवेल अशा पदार्थांचा कधीही समावेश करू नये; ज्यामध्ये तांदूळ, दही, केळी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्ही या गोष्टी रात्री खाल्ल्यास तुम्हाला खोकल्याचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर रात्री या गोष्टींचे सेवन केल्याने सांधेदुखी आणि सूजदेखील येऊ शकते.

कार्बोहायड्रेट किंवा स्टार्चयुक्त अन्नपदार्थ :

तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणात अशा गोष्टींचा समावेश करू नये, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा स्टार्चचे प्रमाण जास्त असेल. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे वजनही खूप वेगाने वाढत राहते. कधीकधी तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यादेखील जाणवू शकतात. कार्बोहायड्रेट किंवा स्टार्चयुक्त अन्नपदार्थांचे नियमित सेवन केल्याने झोप न येण्यापासून ते इतर आरोग्य समस्यांपर्यंत समस्या उद्भवू शकतात.

तेल आणि मसाले :

जर तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर शक्यतो तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. जेव्हा तुम्ही रात्री अशा पदार्थांचे सेवन करता तेव्हा तुम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो. अशा पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा येण्याचा धोकाही वाढतो.

पाण्याचे प्रमाण जास्त :

ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे अशा गोष्टींचे सेवन टाळावे. ज्या गोष्टींमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यात कलिंगड किंवा टरबूज, लिंबू, दही आणि लस्सी यांचा समावेश असतो. जर तुम्ही अशा गोष्टींचे नियमित सेवन सुरू केले तर तुम्हाला पोट फुगणे, गॅस आणि वारंवार लघवी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.