मधुमेह हा सामान्य आजार बनत चालला आहे. जगभरातील ४६३ दशलक्ष लोकं या आजाराने ग्रस्त आहेत. देशात आणि जगात मधुमेह वाढण्यामागे बिघडलेली जीवनशैली, खराब आहार हे मुख्य कारण आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणे थांबवते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. यामुळे वाढत्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

सुप्रसिद्ध योग तज्ज्ञ आणि द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक हंसा जी योगेंद्र यांच्या मते, या आजारापासून वेळीच बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराची वेळीच लक्षणे ओळखून यावर उपचार केला तर यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर वेळीच तोडगा काढता येऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे ज्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि जे रक्तातील साखर सहज नियंत्रित करू शकतात.

How To Make Dahi Mirchi dahi mirchi recipe in Marathi
झणझणीत दही मिरची; दोन भाकऱ्या जास्त खाल या दह्यातल्या मिरचीसोबत, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
nutrition , students, twelve recipes , recipes ,
विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहारात बदल; आता बारा पाककृती निश्चित
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 

जर मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी २५०MG/DL पेक्षा जास्त असेल, तर त्यांनी आवळ्याचा रस प्यावा. आवळा ज्यूस हे असे जादुई पेय आहे ज्याचा वापर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी सहज करता येते. चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून आवळ्याचा रस रक्तातील साखर कशी नियंत्रित करतो.

आवळ्याचा रस रक्तातील साखरेचे नियंत्रण कसे करतो?

पोषक तत्वांनी समृद्ध, आवळ्यामध्ये क्रोमियमसारखे घटक असतात जे कर्बोदकांमधे मेटाबॉलिज्म मजबूत करतात. आवळ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. ऑक्सिडेटिव्ह ताण कमी झाल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण राहते. आवळा खाल्ल्याने स्वादुपिंड वेगाने इन्सुलिन तयार करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.

( हे ही वाचा: भारतात ‘या’ मंदिरात केली जाते मांजरीची पूजा; ठिकाणाचे नाव जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

व्हिटॅमिन सी समृद्ध आवळ्याचा रस रक्तातील साखर नियंत्रित करतो

आर्काइव्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आवळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे मधुमेह नियंत्रित करते. रोज एक ग्लास आवळ्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांवर औषधाप्रमाणे काम करतो.

Story img Loader