आजकाल सोशल मीडियावर आहारामध्ये काय खावे किंवा काय खाऊ नये याबाबत सल्ला देणारे अनेक व्हिडीओ आपण पाहतो. आहारााविषयी दिले जाणारे हे सल्ले कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा पौष्टिक गुणवत्ता यांच्यावर आधारित नसतात. म्हणूनच सध्या ‘नाईटशेड व्हेजिटेबल्स’च्या सेवनाबाबत दिल्या जाणाऱ्या सल्ल्यांबाबत तज्ज्ञांकडून सावधगिरीचा इशारा दिला जातो. नाईडशेड व्हेजिटेबल्स म्हणजे अशा वनस्पती ज्यामध्ये अल्कलॉइड्स असतात. उदाहरणार्थ, बटाटा, वांगे, टोमॅटो, शिमला मिरची व मिरची. या भाज्यांशिवाय आपला आहार पूर्ण होऊ शकत नाही. या भाज्यांशिवाय आपला आहार पूर्ण होऊ शकत नाही. पण, काही सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स अशा भाज्यांचे सेवन हळूहळू कमी करून नंतर आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला देतात. कारण- या भाज्यांमध्ये असेलल्या विषारी घटकांमुळे काही लोकांना ते पचत नाहीत; पण सत्य अगदी उलट आहे. खरं तर या भाज्यांच्या सेवनामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होतात हे सिद्ध करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्याचबरोबर या भाज्यांमध्ये दोन महत्त्वाचे अन्नगट आहेत; जे तंतुमय पदार्थ, सूक्ष्म पोषक घटक व चयापचयासाठी (Metabolic Health) महत्त्वपूर्ण आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा