आपल्यापैकी अनेकांना फळे खायला आवडतात. फळे आवडत नाहीत, अशी व्यक्ती शोधून सापडणे कठीण आहे. फळे आपल्या शरीरासाठीही खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे लोक रोज फळे खाणे पसंत करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, फळे खाण्याचीही एक पद्धत असते. विशेषतः जेव्हा तुम्ही आजारी पडता किंवा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये फळे खाण्याचे काही नियम असतात. त्यामुळे आपण नेमकी कोणती फळे, कोणत्या वेळी खावीत आणि ती खाताना काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती जाणून घेऊ.

आयुर्वेद अभ्यासक निधी पंड्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, “तुम्हाला फळं आवडतात का? आवडत असतील; परंतु माझ्यापेक्षा जास्त नाही. कारण- मला खूप फळं आवडतात. परंतु, मागील १० वर्षांत मी फळं खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला; ज्यामुळे माझं शरीर पूर्णपणे बदललं आहे.” निधी सांगतात की, फळं खाण्याचेही काही नियम आहेत.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Why You Should Avoid Reheating Rice - Expert's Warning Reheating rice cause food poisoning
महिलांनो रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी पुन्हा गरम करून खाता का? ‘हे’ गंभीर परिणाम ऐकून धक्का बसेल
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?

निधी यांनी फळे खाण्याच्या बाबतीत सांगितलेले काही नियम

  • एकाच वेळी विविध फळे जास्त प्रमाणात खाऊ नका. प्रत्येक फळामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. तसेच एकाच वेळी एक किंवा दोन समान गुणधर्म असलेली फळे खा.
  • फळे लवकर खराब होतात. त्यामुळे ती खराब होण्याआधी खा.
  • सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० च्या दरम्यान फळे खा; तसेच नाश्त्याला फळे खाऊ नका.
  • सर्व फळे सारखी नसतात. त्यामुळे ती खूप काळजीपूर्वक निवडा. तांदूळ आणि गहू यांच्या पौष्टिक सामग्रीमध्ये जेवढा फरक असतो, तेवढाच फरक दोन फळांमध्ये असतो.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजारी असताना फळे खाऊ नये. विशेषतः ताप किंवा सर्दीमध्ये फळे खाणे टाळण्याचा सल्ला निधी यांनी दिला आहे. परंतु, डाळिंब मात्र कोणीही, कधीही खाऊ शकते. जरी तुम्ही आजारी असाल तरीही डाळिंब खाऊ शकता.

हेही वाचा- दिवसातून दोनदा कॉफी प्यायल्याने तुमच्या यकृताचे रक्षण होऊ शकते का? संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या…

जेवणादरम्यान फळे खाणे योग्य की अयोग्य?

जेवणादरम्यान फळे खाणं कधीही चांगलं असतं. कारण- ती चांगलं पोषण शोषण्यास मदत करतात, असं पवित्रा एन. राज (मुख्य आहारतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल, यशवंतपूर, बंगळुरू) यांनी सांगितलं, तर त्या पुढे सांगतात की, फळांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ती जेवणादरम्यान खाण्याचा सल्ला दिला जातो; जेवणाबरोबर एकत्रित खाण्याचा सल्ला दिला जात नाही.

पुढील प्रकारची फळे कधीही एकत्र खाऊ नयेत :

  • तुरट फळे : सफरचंद, बेरी, चेरी व नासपती.
  • गोड फळे : पपई, आंबा, केळी, पीच व अॅव्होकॅडो
  • आंबट फळे : संत्री, लिंबू व द्राक्षे

तसेच तज्ज्ञांच्या मते, फळं एकत्र केल्यानं काही पचन आणि पोट फुगण्याशी संबंधित समस्या उदभवू शकतात. त्यामुळे एकाच वेळी एक फळ खाणं केव्हाही चांगलं असतं. कारण- प्रत्येक फळाचे गुणधर्म वेगळे असतात. जसे की, काही लिंबूवर्गीय असतात, काही कार्बोहायड्रेट्सयुक्त असतात आणि काही व्हिटॅमिन व पोटॅशियमयुक्त असतात, असेही पवित्रा सांगतात.

Story img Loader