“ पल्लवी, मसाल्याचे पदार्थ एक्स्पायरी डेट पर्यंत वापरले तर चालतात का ? “
मागून आवाज आला – “ त्यापण हेच सांगतील – रियूझ , रिसायकल “
माझा आणि विनीलचा व्हिडीओ कॉल सुरु होता आणि विनीलच्या आईचा आवाज आला .
माझं कुतूहल आणखी वाढलं .
मी म्हटलं “पण इतका वेळ मसाले वापरलेच गेले नाहीयेत का ?”
त्यावर विनील हसून म्हणाला – “ मी माझ्यासाठी वेगेवेगळे मसाले आणत असतो . ग्रेव्ही तयार करायला फार मदत होते . रोज कोण ताजे मसाले करणार ?”
मी म्हटलं “ बरोबर आहे . तयार मसाले सोयीचे आहेत पण ते योग्य वेळी वापरणं देखील तितकाच महत्वाचं आहे .एकदा पाकीट उघडलं कि ते जास्तीत जास्त १ महिन्याभरात वापरलं जाणं अपेक्षित असतं “
हे झालं कोरड्या मसाल्याचं पण मॉइश्चर बेस्ड मसाले (आर्द्रता असणारे ) जास्तीत जास्त ३ दिवसात वापरायला हवेत “
यावर विनील ने समजावून मान डोलावली आणि आमच्या कॉल नंतर मला एक फोटो आला ज्यात मसाल्यांची पाकिटं योग्य वेळी काढून टाकल्यामुळे फडताळ आणि फ्रिज दोन्ही ताजेतवाने दिसतायत अशी तळटीप होती ?
या संवाद दरम्यान मला आहार साक्षरता हा मुद्दा कायम नव्याने पोहोचायला हवा हे अधोरेखित झालं.
दरवेळी आहार साक्षरता म्हटलं की कोणत्या प्रकारचा डायट असतं त्याबद्दलची माहिती असा एक सांगत असतो मात्र आहार साक्षरता म्हणजे आपण ज्या प्रकारचं खाणं वापरतो ज्या प्रकारचे पदार्थ बाजारातून खरेदी करतो या सगळ्या पद्धतीची माहिती देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण कोणत्याही पद्धतीचं पद्धतीचं रेडीमेड किंवा साठवणीचे खाणं खरेदी करतो तेव्हा त्यावरील अन्न घटक, पदार्थ तयार करण्यासाठी लागणारं जिन्नस याबद्दल संपूर्ण माहिती लिहिलेली असणे नियमाधारित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा