अनेकजण शिजवलेल्या अन्नासह कच्चे अन्न म्हणजे सॅलड, फळे खातात. हॉटेल्समध्येही पदार्थांसह रायता, सॅलड दिले जाते. परंतु, शिजवलेल्या अन्नसह कच्चे अन्न खाणे आरोग्यदायी असते किंवा नाही, तसेच शिजवलेल्या अन्नासह काय खावे, काय खाऊ नये आणि त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

डॉक्टरांचे असे मत आहे की, आपले शरीर शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न वेगवेगळ्या प्रकारे पचवत असते. त्यामुळे जेव्हा शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्रित खाल्ले जाते, तेव्हा त्या अन्नाचे कमी पचन होऊन, किंवा न पचता विघटित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिजवलेले अन्न आणि न शिजवलेले अन्न एकत्रित खाऊ नये. जेवण करताना अनेकांना फळे खाण्याची सवय असते. परंतु, जेवणाच्या आधी ३० मिनिटे किंवा जेवणानंतर दोन तासांनी फळे खावीत. जेवणासह फळे खाऊ नयेत. यामुळे अपचन किंवा गॅसेस चा त्रास होऊ शकतो.

milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Happens If You Drink Coconut Water, Lemon Water, Ginger Shot Every Day
नारळ पाणी, लिंबू पाणी, आले गोळीचे रोज सेवन केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
What happens to the body if you include turmeric in your diet for 2 weeks straight
रोजच्या आहारात सलग दोन आठवडे हळद वापरल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा….
sleep relation with health
Health Special: निवांत झोप आणि आरोग्याचं नातं

शिजवलेले आणि न शिजवलेले पदार्थ यांच्या पचनात काय फरक आहे ?

आपली पचनसंस्था थोडी गुंतागुंतीची असते. त्यामध्ये शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र खाल्यास त्याची गुंतागुंत वाढू शकते. शिजवलेल्या अन्नाचे पचन करणे शरीराला सोप्पे जाते. न शिजवलेले अन्न, कच्चे अन्न याचे पचन करण्यासाठी शरीराला अधिक पाचक द्रावणाची आवश्यकता असते. जेव्हा शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र केले जाते, तेव्हा पचनाचे त्रास सुरु होतात. सतत ढेकर येणे, गॅस, अपचन होणे इ. कारण कच्चे अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रयत्नांची आवश्यकता असते. अन्न चघळणे किंवा अन्न चावून खाणे ही पचनाची पहिली पायरी आहे आणि जेव्हा अन्न अयोग्यरित्या चघळले/चावले जाते तेव्हा त्यामुळे पचनास त्रास होतो. शिजवलेले अन्न चावण्याची क्रिया व्यवस्थित होते किंवा ते कमी चावले गेले तरी जठरात त्याची पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकते. कच्चे अन्न , न शिजवलेले पदार्थ आणि शिजवलेले अन्न या दोहोंचे वेगवेगळ्या स्तरावर शरीराला फायदे असतात. कच्च्या अन्नामध्ये ज्यात सॅलड, फळे यांचा समावेश असतो, त्यात पोषकद्रव्ये अधिक असतात. परंतु, ते पचण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. शिजवलेल्या अन्नामचे पोषणमूल्य कमी होते. परंतु, ते पचण्यास सुलभ असते.

हेही वाचा : ‘या’ महिलांना बीजांडकोशाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक ! कोणत्या व्यवसाय करणाऱ्या महिला ठरू शकतात कर्करोगग्रस्त

शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न एकत्र खाण्याचे दुष्परिणाम

आहारतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांनी इन्स्टाग्रामवर या विषयावर एक माहितीपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिजलेले पदार्थ कधीही न शिजवलेल्या पदार्थात मिसळू नका. त्यामुळे आतड्यांना सूज येते. पोट फुगणे हा आजार नाही. अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे, अन्नाचे चुकीच्या पद्धतीने मिश्रण केल्यामुळे, आधीचे न पचलेले अन्न आणि नवीन अन्न यांचे मिश्रण झाल्यामुळे पोटाचे विकार उद्भवतात.

धान्य, भाज्या, मसूर, डाळी आणि सोयाबीन यांसारखे घटक पदार्थ तेल, मसाले, मीठ आणि औषधी वनस्पती वापरून शिजवले जातात. ते शरीराद्वारे सहज पचले जाऊ शकतात, शोषले जाऊ शकतात. दुसरीकडे फळे आणि भाज्यांच्या सॅलड्स सारख्या कच्च्या पदार्थांमध्ये फळांमधील ऍसिड, भाज्यांमधील फायबर, अन्य जीवाणू सक्रिय अवस्थेत असतात. अन्न शिजवले जाते, तेव्हा अशा प्रकारचे ऍसिड, जीवाणू, अन्य घटक नष्ट होतात. त्यामुळे ते सहज पचले जाते. कच्च्या अन्नामध्ये असणारे घटक शिजलेल्या अन्नातील घटकांना हानी पोहोचवू शकतात. तसेच, कच्चे मांस, सीफूड, अंडी असे घटक पूर्ण शिजवले गेले नाही, तर अन्न विषबाधा होऊ शकते. तसेच फळे, भाज्या कापून खाताना कटर, चॉपिंग बोर्ड, हात यांच्यावर असणारे जीवाणूही तसेच पोटात जाण्याची शक्यता असते.

…तर काय कराल ?

डॉ जांगडा यांनी काही नियम सांगितले आहेत. तुम्ही शिजवलेले जेवण खात असाल, तर तेच खावे आणि अर्धा किंवा एक तासानंतर पाणी प्यावे. तुम्ही फळे किंवा भाजी, सॅलडसारखे न शिजवलेले पदार्थ खात असाल तर न शिजवलेले पदार्थच खा. एकावेळी एकाच प्रकारच्या भाज्या किंवा फळे खा. न शिजवलेल्या अन्नातही वेगवेगळे मिश्रण करू नका. शिजवलेल्या अन्नानंतर २ तासांनी न शिजवलेले अन्न घ्या.

आपले शरीर वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पचवत असते. शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या अन्नाचे मिश्रण केल्यामुळे अपचन आणि पोटाचे अन्य विकार होऊ शकतात. त्यामुळे जेवताना योग्य ती काळजी घ्यावी.