अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांना नुकतीच बंदुकीच्या गोळीमुळे दुखापत झाल्याने ते चर्चेत आले होते. त्यांना मुंबईतील क्रिटीकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गोविंदा कोलकात्याला रवाना होण्याच्या तयारीत असताना मंगळवारी (१ ऑक्टोबरला) ही घटना घडली. परवानाधारक बुंदकीची सफाई करत असताना चुकून त्यांच्या गुडघ्याच्या खाली गोळी लागली होती. गोविंदा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून गोळी काढली, त्यानंतर आता तीन दिवसांनी गोविंदा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गोविंदा यांचे जवळचे सहकारी शशी सिन्हा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा आपले रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना त्यांचा पाय घसरला, त्यामुळे चुकून बंदुकीतून गोळीबार झाला. ही घटना घडली तेव्हा ते कोलकात्याला रवाना होणार होते. त्यांनी आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर कपाटात व्यवस्थित ठेवले होते, जेव्हा शस्त्र हाताळत असताना ते जमिनीवर पडले तेव्हा चुकून गोळी सुटली आणि त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या खाली दुखापत झाली. गोळी शस्त्रक्रिया करून काढण्यात आली आहे.

बंदुकीच्या गोळीमुळे झालेल्या जखमेची तीव्रता आणि गोळी कुठे लागली आहे, यानुसार दुखापतीतून बरे होणे अवलंबून आहे.

हेही वाचा – जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

बंदुकीची गोळी लागल्यानंतर बरे होण्यास किती काळ लागतो?

हाड विरुद्ध सॉफ्ट टिश्यूच्या दुखापती (soft tissue injuries)

सॉफ्ट टिश्यूच्या दुखापती म्हणजे स्नायू, लिगामेंट्स (ligaments हा ऊतींचा एक पट्टा असतो जो हाडे, सांधे किंवा अवयवांना एकत्र जोडतो आणि त्यांना स्थिर ठेवतो) आणि टेंडनस् (tendons हाडे आणि स्नायूंना जोडणारी संयोजी ऊती) यांना दुखापत होते, जे हाडे आणि स्नायूंना जोडणारे आणि सॉफ्ट टिश्यू असतात.

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना इंटरलनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ता यांनी सांगितले की, “गोळीच्या दुखापतींसाठी पुनर्प्राप्तीची वेळ मुख्यत्वे हाडे किंवा मऊ ऊतींचे नुकसान आहे की नाही यावर अवलंबून असते. जर गोळीमुळे हाडांना दुखापत झाली असेल तर बरे होण्यास चार आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. हाडांचे फ्रॅक्चर किंवा विस्कळीत होणे बरे होण्यास लांबणीवर टाकू शकते, विशेषत: शस्त्रक्रिया, जसे की हाडांमध्ये प्लेट ठेवणे, ते स्थिर करण्यासाठी आवश्यक असल्यास.”

:सॉफ्ट टिश्यूच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी सामान्यतः कालावधी खूपच कमी असतो, सुमारे १० ते १५ दिवस. या दुखापतींमध्ये हाडांऐवजी स्नायू आणि त्वचेचा समावेश होतो, ज्यामुळे धमन्या किंवा शिरा यांसारख्या महत्त्वाच्या संरचनांचा समावेश नसेल तर रुग्ण जलद बरे होऊ शकतो. गोविंदा यांच्या बाबतीत, जर त्यांना हाडांना दुखापत झाली असती तर त्यांचा बरे होण्याचा कालावधी किमान एक महिन्यापर्यंत वाढू शकतो,” असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

गोळी लागल्यानंतर दुखापतीचे मूल्यांकन कसे केले जाते?

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना इमर्जन्सी मेडिसिनतज्ज्ञ डॉ. तमोरिश कोळे भर देतात की,” गोळी लागल्यानंतर बरे होण्यासाठी आणि शस्त्रक्रिया पद्धती ही गोळी कोणत्या ठिकाणी लागली आहे आणि आसपासच्या ऊतींवर होणाऱ्या परिणामांवर खूप अवलंबून असतात. गंभीर घटकांमध्ये गोळी शरीरातून गेली की आतच राहिली आणि कोणत्याही मोठ्या धमन्या किंवा नसांना इजा झाली की नाही याचा समावेश होतो. इमेजिंग स्कॅन जसे की एक्स-रे किंवा सीटी स्कॅन हे बुलेटचा मार्ग निश्चित करण्यासाठी आणि हाडे, अवयव किंवा रक्तवाहिन्यांना संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

गोविंदा यांच्या गुडघ्याच्या खालच्या पायाच्या भागात दुखापतीमध्ये धमनी किंवा रक्तवाहिनीला आघात झाल्यास धोका जास्त वाढला असता, ज्यामुळे बरे होण्यासाठी गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली असती आणि रक्तवहिन्यांसंबंधी शस्त्रक्रियेची गरज निर्माण झाली असती. सुदैवाने, या प्रकरणात असे दिसते की, “गोळीने गंभीर रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचवलेले नाही, त्यामुळे परिस्थितीची गुंतागूंत कमी झाली आहे.

हेही वाचा – रोज बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

बंदुकीचा प्रकार आणि गोळी कुठे लागली आहे यानुसार दुखापतीची तीव्रता ठरते

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना AIIMS चे ट्रॉमा सर्जन डॉ. अमित गुप्ता ठळकपणे सांगतात की, “बंदुकीचा प्रकार आणि बंदुकीच्या गोळीच्या जखमेचे स्थान दुखापतीच्या मर्यादेवर लक्षणीय परिणाम करतात. रिव्हॉल्व्हरसारख्या कमी वेगाच्या बंदुकांपेक्षा ॲसॉल्ट रायफलसारख्या उच्च-वेगाच्या बंदुकांमुळे जास्त नुकसान होते. ज्या अंतरावरून गोळी झाडण्यात आली, तीदेखील महत्त्वाची भूमिका बजावते; जवळच्या शॉट्समुळे सामान्यत: उच्च प्रभाव शक्तीमुळे अधिक गंभीर जखमा होतात.

डॉ. गुप्ता म्हणाले, “गोविंदाच्या बाबतीत गुडघ्याच्या खाली गोळी लागली आहे, ते असे ठिकाण आहे, जिथे गोळीची जखम क्वचितच जीवघेणी असू शकते. पायांचे जाड स्नायू ऊती (thick muscle tissue आणि खोलवर असलेल्या नसा (deep-seated nerves ) काही प्रमाणात संरक्षण देतात, ज्यामुळे महत्त्वाच्या संरचनेचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. जर गोळीच्या आघातामुळे किंवा मज्जातंतूंना नुकसान झाले असेल तर Recovery प्रक्रिया अधिक जटिल असू शकते.

हाड फ्रॅक्चर असलेल्या रूग्णांसाठी जखम बरी करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते, ज्यामध्ये मेटल प्लेट्स किंवा स्क्रूने हाडांना बरे होण्यास मदत होते. डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, “रक्तवहिन्यांसंबंधी दुखापतींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्येही बरे होण्याची प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहिल्यास सामान्यत: एक महिना ते दीड महिन्याच्या आत वजन वाढणे सुरू होऊ शकते. मज्जातंतूंचे नुकसान पण अधिक आव्हानात्मक परिस्थिती असू शकते, कारण नसा सहजपणे पुन्हा निर्माण होत नाहीत.