थंडीमध्ये माणूस खा-खा करतो, भरपूर खातो, याचे अजून एक वेगळे स्पष्टीकरणसुद्धा दिले जाते. बर्फाळ प्रदेशामधील अस्वलं सहा महिने भरपूर आहार घेतात आणि शरीरामध्ये चरबीचा मुबलक साठा करुन ठेवतात. कारण पुढचे सहा महिने बर्फ पडत असताना त्यांना अन्न मिळणार नसते. भविष्यात अन्नाचे दुर्भिक्ष्य होईल तेव्हा शरीरामध्ये जमवलेल्या चरबीच्या साठ्यावरच शरीर जिवंत ठेवायचे असते. याच प्रकारची मनोधारणा मनुष्याची थंडीच्या मोसमात होत असावी अशी शक्यता आहे. कारण कधीकाळी मनुष्यप्राणीसुद्धा बर्फाळ प्रदेशामध्ये राहत होता. बर्फ पडणार्या ऋतूमध्ये अन्नाची होणारी कमी मानवानेही हजारो वर्षे अनुभवली आणि त्यावर उपाय म्हणून जेव्हा अन्न मुबलक उपलब्ध होईल तेव्हा अतिसेवन करुन शरीरामध्ये चरबी जमवून ठेवायची असा मानवाचाही इतिहास आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा