Health Special: वर्षा ऋतू म्हणजे जून महिन्याचा उत्तरार्ध; जुलै महिना व ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध होय. वर्षा ऋतूत शरीराचे व्यवहार हळूहळू बदलत असतात. ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात शरीरातील वातदोष वाढलेला असतो. या बिघडलेल्या वातदोषाला वर्षा ऋतूतील थंडाव्याची जोड मिळाली की, तो चेकाळतोच ! जोडीला मंदावलेली पचनक्रिया तर असतेच. वर्षा ऋतूचे वैशिष्ट्य म्हणजे या ऋतूत पित्तसंचयाला सुरुवात होते. त्यामुळे वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक आजार उद्भवू शकतात.

नवं पाणी बाधतं

तळ्यात, विहिरीत, तलावांवर नवे पाणी येते. नवे पाणी म्हणजे जमिनीवरील सर्व मलमूत्र आपल्यासोबत वाहून आणणारे पाणी. रोगजंतूंचा भरपूर साठा असणारे पाणी, यशिवाय पावसाबरोबर माश्याही वाढतात. पाणी व अन्नपदार्थांवर घोंघावणाऱ्या माश्यांचा उपद्रव, त्यामुळे हगवणीसारखे आजार, उलट्या-जुलाब सुरु होतात. पोट बिघडणे, गॅस धरणे, आव पडणे अशा तक्रारी या काळात सुरु होतात. यालाच आपण म्हणतो, “नवं पाणी बाधलं!”.

2-2-2 diet really beneficial for weight loss
वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Which water workouts burn more calories?
पाण्यातील व्यायामाने राहा तंदुरुस्त; पोहता येत नसेल तरी करता येतील असे चार व्यायामांचे जबरदस्त फायदे
Health Special, Health,
Health Special: व्यक्ती व्यसनाधीन कशी व का होते?
How To Get Rid Of Phlegm/Cough
काळी मिरी, हळदीसह सद्गुरूंनी सांगितलेले हे ४ उपाय केल्यास कफ पटकन पडेल बाहेर; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
beetroot-pineapple-lemon juice remedy for iron deficiency
रक्तातील लोह वाढवण्यासाठी ‘बीट, अननस अन् लिंबाचा रस ठरेल का फायदेशीर? काय सांगतात तज्ज्ञ?
Dinesh Lad shared a funny story of Rohit's
“यावेळी १०० अंडी आणून ठेवतो बघू…”, रोहित शर्माबद्दल बालपणीच्या कोचचे मजेशीर वक्तव्य, जाणून घ्या काय आहे कारण?

हेही वाचा – काळी मिरी, हळदीसह सद्गुरूंनी सांगितलेले हे ४ उपाय केल्यास कफ पटकन पडेल बाहेर; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा

पोटाच्या वाढत्या तक्रारी

सर्व डॉक्टरांकडे जास्त रुग्ण हे पोटाच्या तक्रारीचे असतात. उघड्यावरील पदार्थ खाणे, चुकीचा जड आहार घेणे यामुळे वर्षाऋतूत अनेकांचे पोट बिघडत राहतं. पावसाळ्याच्या सुरुवातीला आभाळ भरुन येते, गार वारा सुटतो. त्यामुळे या पावसाच्या थंडीवाऱ्यात सांधेदुखी बळावते. पन्नाशी उलटलेल्या लोकांचे सांधे कुरकुरायला लागतात. गारठा व पावसात भिजणे यामुळे सर्दी- पडश्याला आमंत्रण मिळते. या थंड वातावरणात दमेकऱ्यांचा दमादेखील बऱ्याचदा बळावला जातो. शिवाय पावसात आपण वापरतो प्लास्टिक चपला व प्लास्टिकचे बूट, या प्लास्टिक बुटात पाणी साचून रहिल्याने पायाला बोटांच्या मध्ये चिखल्या होऊ लागतात.

लेप्टोस्पायरोसिसचा धोका

पावसाळ्यात पावसाचे पाणी जिथे- तिथे साठून राहते. या साठलेल्या पाण्यात उंदीर तसेच कुत्र्या- मांजरांचे मलमूत्र मिसळले जाते. पावसाच्या पाण्यात चालल्यास व शरीरावरील जखमेत पाणी गेल्यास व पावसाचे पाणी अनावधानाने पोटात गेल्यास लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. सर्व रुग्णालयात पावसाळ्यात प्रचंड गर्दी असते. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, ताप व इतर आजार असतात. हे सर्व आजार लवकर औषध घेतल्यास बरे होतात, पण याकडे दुर्लक्ष केल्यास जीवघेणेही ठरू शकतात.

हेही वाचा – पाण्यातील व्यायामाने राहा तंदुरुस्त; पोहता येत नसेल तरी करता येतील असे चार व्यायामांचे जबरदस्त फायदे

पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

१) पायात चप्पल न घालता अजिबात फिरु नये.
२) दुपारची झोप या ऋतूत शक्यतो टाळावी.
३) पायात चिखल्या होऊ नये म्हणून पाय कोरडे ठेवावेत. त्यांना पावडर लावावी.
४) पायाला निलगिरीचे तेल वा वेखंड, कापूर याने सिद्ध तेल वापरावे. हातापायाच्या तळव्यांना हे वापरावे.
५) घरामध्ये हवा शुद्धीसाठी चंदन, वाळा, कापूर, उद यांचा धूप करावा.
६) साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये. मुलांना तर बिलकूलच डुंबू देऊ नये.