आहारात डाळींचं किती महत्त्व आहे हे आपण आधीच्या लेखात समजून घेतलं. या लेखात आपण कडधान्यांची भूमिका समजून घेऊया. किती प्रकारची कडधान्यं आहेत, त्यांचे उपयोग काय, कडधान्यं खाताना काय काळजी घ्यावी हे सगळं लक्षात घेणं आवश्यक आहे.

हिरवे मूग

हलके गोडसर आणि काहीसे तुरट अशी चव असणारे मूग चविष्ट कडधान्य आहे. जीवनसत्त्व अ , ब , लोह, कॅल्शिअम आणि फॉस्फरस तसंच फायबर (तंतुमय पदार्थ) आणि आवश्यक स्निग्धांशांचं उत्तम प्रमाण असणारे मूग पचायला हलके आणि आरोग्यदायी आहेत. मूग डाळीइतकेच अख्खे मूग सुद्धा पोषक असतात. नियमित मुगाची उसळ आहारात असावी. ज्यांना ताप, सर्दी पडसे यासारखे विकार होतात त्यांनी नियमितपणे मुगाचे सेवन करावे.

Online wedding registration proccess
लग्नाची ऑनलाइन अन् ऑफलाइन नोंदणी कशी करायची? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
How do you manage salary expenditures
कर्मचाऱ्यांनो​, महिन्याचा पगार लगेच संपतो; पगाराचे कसे नियोजन करावे? जाणून घ्या, खास टिप्स
Which finger should you get a glucometer test done on?
तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या
Fresh ginger vs dried ginger: Which is better for your health?
ताजे आले की वाळलेले आले? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर; जाणून घ्या कोणते आले वापरायचे?
sleep relation with health
Health Special: निवांत झोप आणि आरोग्याचं नातं
Malaria Causes, Symptoms and Precautions in Marathi This monsoon, use these practical safety tips when travelling to malaria-endemic areas
पावसाळ्यात फिरायला जाताय? मलेरिया होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी अन् ॲडमिट होण्याचा धोका टाळा
Maharashtrian batatyachi bhaji recipe naivedya recipe
नैवेद्याची बटाटा भाजी; १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

कुळीथ

तांबड्या रंगाचे किंवा गडद राखाडी रंग असणारे कुळीथ अनेक घरात वापरले जातात. कुळथाचं पिठलं किंवा कुळथाची डाळ ही शरीरासाठी अत्यंत आरामदायी असते विशेषतः ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी कुळीथ अत्यंत उपयुक्त आहेत. सुकलेला कफ किंवा कोरडा कफ ,दमा अशा विकारांमध्ये देखील कुळथाचा काढा हा अत्यंत उपयोगी पदार्थ आहे. मूळव्याध ,आमवात असेल तर कुळीथ अत्यंत गुणकारी आहेत. उत्तम केस, स्नायूंच्या ताकदीसाठी कुळीथ विशेष उपयुक्त आहेत.

हेही वाचा…Health Special : हिवाळा संपता संपता कडू का खावं? 

काबुली चणे

साधारण ७५०० वर्षांपूर्वीच्या आरोग्यविषयक आणि आहारविषयक साहित्यामध्ये काबुली चण्यांचा समावेश केलेला आढळतो. काबुली चणे वाफवताना त्यात एखादे तमालपत्र आणि १ चमचा तेल किंवा तूप टाकून वाफवावेत. व्यायाम करणारे, धावणारे, सायकलचालक आणि पोहणारे तसेच विविध खेळाडूंसाठी काबुली चणे प्रथिनांचे आणि आवश्यक ऊर्जेचे उत्तम स्रोत आहेत.

हरभरा

चवीला उत्तम, चण्यांचाच एक प्रकार म्हणून हरभरा खाल्ला जातो. हिरवे आणि तांबडे अशा रंगात हरभरा आहारात वापरला जातो. लोह, प्रथिने आणि ऊर्जेने भरपूर असणारा हरभरा पोषक, चविष्ट आणि तितकाच आरोग्यदायी आहेत. आजार बरे होताना हरभऱ्याचा काढा अत्यंत उपयुक्त आहे. कफविकार असणाऱ्यांसाठी देखील हरभऱ्याचा काढा आरोग्यदायी आहे.

चवळी

पांढऱ्या रंगाची चवळी प्रथिने आणि ऊर्जेने भरपूर आहे. काहीशी पिठूळ आणि पचायला जड असणारी चवळी ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे.

हेही वाचा…Health Special : फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम काय असतो? त्याने आपल्या एकाग्रतेवर कसा परिणाम होतो? 

पावटे किंवा वाल

वाल किंवा पावटे, हिरवे वाल , कडवेवाल असे वालाचे अनेक प्रकार आहेत. हिरव्या शेंगांतील वाल सगळ्यात पौष्टिक मानले जातात.

ज्यांचा मेटाबॉलिझम चांगला आहे त्यांच्यासाठी अत्यंत चांगले कडधान्य आहे. वाल पचायला जड आहेत त्यामुळे त्याच्याबरोबर जिरेपूड, लसूण वापरणं आवश्यक आहे.

हे झालं कडधान्यांबद्दल पण कडधान्य खाताना विशेष काळजी घ्यावी लागते.

कडधान्यं भिजवणे /मोड येणे

कडधान्ये पाण्यात भिजवल्याने त्यातील फायटेट नावाचा अन्न घटक ज्यामुळे कडधान्ये पचण्यासाठी जड ठरतात त्यांचे प्रमाण कमी होते. साधारण ४८ ते ७२ तासांनी कडधान्यांना मोड येतात. मोड आल्यानंतर कडधान्यांतील प्रथिने, फायबर आणि आवश्यक स्निग्धांशाचे प्रमाण वाढते. ते पचायला हलके होतात.

हीच कडधान्यं जर नीट शिजवून आहारात समाविष्ट केली नाही तर मात्र गॅसेस होणे, पोट फुगणे अपचन होणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात.

हेही वाचा…Health Special : पेन बिहेवियर म्हणजे काय?

कडधान्यांचा चिला /पोळा

कडधान्ये किंवा डाळी मध्यम आचेवर भाजून त्याचे पीठ तयार करू वापरल्यास चिला आणि पोळा यासारखे पौष्टिक पदार्थ नेहमीच्या आहारात वापरले जाऊ शकतात. कडधान्यांपासून पोळा किंवा चिला तयार करताना त्यात जिरेपूड, धणेपूड आणि भरपूर भाज्या समाविष्ट कराव्यात.

कडधान्यांचे पाणी

अनेकजण कडधान्ये उकडल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकतात. या पाण्यात अनेक जीवनसत्त्वं आणि प्रथिने असतात. त्यामुळे कडधान्ये शिजवल्यानंतर त्यातील पाणी उसळ तयार करताना जरूर वापरावेत.