नवी दिल्ली : न्याहरीला काही जण महत्त्व देत नाहीत. त्यामुळे ते न्याहरीमध्ये बिस्कीट, चिप्स किंवा अन्य तळलेल्या पदार्थाचा समावेश करतात. परंतु एका नव्या संशोधनानुसार न्याहरी ही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे हे सिद्ध झाले आहे. ‘जोई प्रिडिक्ट’ नावाच्या या अहवालात ८५४ लोकांच्या न्याहरीच्या सवयीचे विश्लेषण केले आहे. ते ‘युरोपीय जर्नल ऑफ न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झाले आहे.

हेही वाचा >>> Health Special: मानसिक स्थिती आणि त्वचाविकार यांचा संबंध असतो का?

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
IIT mumbai
तेल शुद्धीकरण कारखान्यांतून सोडलेल्या पाण्यामध्येच प्रदूषक नष्ट करणारे जीवाणू; आयआयटी मुंबईतील संशोधकांचे संशोधन
kalyan ganeshotsav 2024
कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान, जलप्रदूषण रोखण्यासाठी कडोंमपाचा उपक्रम
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
navi Mumbai potholes repairing works
नवी मुंबई: गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्तीला वेग, ९५ टक्के खड्डेदुरुस्तीचा पालिकेचा दावा

संशोधनानुसार २५ टक्के लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या भोजनात पौष्टिक पदार्थाचा समावेश करत असले तरी न्याहरीमध्ये बिस्कीट, चिप्स यासारख्या पदार्थाचा समावेश करतात. त्यामुळे त्यांचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. अशा लोकांना मेंदूघात किंवा हृदयरोग होण्याचा धोका अधिक असतो. ‘किंग्ज कॉलेज लंडन’च्या डॉ. सारा बेरी यांनी सांगितले की, न्याहरीमध्ये चिप्स, बिस्कीट आदी पदार्थाऐवजी फळे, सुकामेवा यांचा समावेश करावा. न्याहरी टाळणारे किंवा न्याहरीत पौष्टिक पदार्थाचा समावेश न करणाऱ्यांचे वजन वाढण्याचा तसेच मेंदूघात किंवा हृदयरोग होण्याचा धोका असतो.