नवी दिल्ली : वाढत्या वयाबरोबर अनेक शारीरिक व्याधी होण्याचा धोका असतो. विशेषत: निर्णय घेण्याच्या क्षमतेवर अधिक परिणाम होतो. तसेच स्मृतिभ्रंश व्याधीची शक्यता असते. त्यामुळे वाढते वय आणि आरोग्यासंबंधी अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे.

एका संशोधनानुसार तरुण वयात व्यायामाला सुरुवात केली आणि योग्य आहार घेतला तर भविष्यात स्मृतिभ्रंशसारख्या गंभीर आजारापासून दूर राहता येते. याच संशोधनात नियमित व्यायामाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच वयाच्या ६० व्या वर्षी रोज २० -३० मिनिटे व्यायाम करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

Success Story of Ramlal Bhoi
Success Story : वयाच्या ११ व्या वर्षी लग्न, घरच्यांचा शिक्षणाला विरोध; वाचा हार न मानता NEET मध्ये बाजी मारणाऱ्या रामलालची यशोगाथा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Audit Provisions in the Income Tax Act
प्राप्तिकर कायद्यानुसार लेखापरीक्षण म्हणजे काय? नवीन तरतुदी कुणाला लागू?
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Two years rigorous imprisonment for astrologers who claim to have a child
भंडारा : अपत्य प्राप्तीचा दावा करणे ज्योतिषांना भोवले!
significant reduction in infant mortality in the state
राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट!

हेही वाचा >>> वजन कमी केल्यामुळे कसा कमी होतो गुडघेदुखीचा त्रास; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

पीर रिव्ह्यूव्ह सायंटिफिक जर्नल सेलमध्ये यासंबंधी संशोधन नुकतेच प्रकाशित झाले आहे. यानुसार व्यायामामुळे आयरीसीन हे संप्रेरक निर्माण होते. त्याचा उपयोग स्मृतिभ्रंश या आजाराला दूर ठेवण्यासाठी मदत होते. आयरीसीन हे नेप्रिल्सिनचा स्तर वाढवतो. त्यामुळे मेंदूचे नुकसान करणाऱ्या असामान्य प्रथिने अमाईलॉइड बिटाचा सामाना करता येतो. या संशोधकांच्या म्हणण्यानुसार स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांनीही निमयित व्यायाम केला तर रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता असते.