आधुनिक आहारतज्ज्ञ सकाळी उठल्या-उठल्या नाश्ता (न्याहरी) करण्याचा सल्ला देतात, तो योग्य असतो काय?याचा जरा विचार करू. ब्रेकफास्ट म्हणजे रात्रभर पोट रिकामे असते, म्हणून सकाळी उठल्यावर भरपूर नाश्ता करावा व फास्ट (उपवास) ब्रेक करावा असे यांचे मत. ‘परंतु आपले शरीर सकाळ सकाळी उठल्या -उठल्या आहारग्रहणासाठी तयार असते काय?’या प्रश्नाचे उत्तर (अर्धशिशीचे रुग्ण, क्षयाचा उपचार घेणारे रुग्ण, ज्यांचा अग्नी प्रखर असतो अशा पित्तप्रकृती व्यक्ती,व्यायामपटू,खेळाडू असे अपवाद वगळता)’नाही’ असेच द्यावे लागेल.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा शरीराचे तापमान तुलनेने कमी असते,शरीराचा मेटाबोलिक रेटही मंदावलेला असतो,यालाच आयुर्वेद ‘अग्नी मंद असतो’ असे म्हणते.

आणखी वाचा: Health Special: गुणकारी ताकाची गोष्ट

Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Here what happens to the body when you finish meals in less than 10 minutes
तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा….
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
Why Drinking Cold Water May Not Be Good For Your Digestive System, As Per Experts
थंड पाणी सोडून रोज कोमट पाणी प्यायलं तर शरिरावर काय परिणाम होतील? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
This is what happens to fat loss goals when you have just two eggs for breakfast daily
दररोज नाश्त्याला दोन अंडी खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होईल? वजन कमी करत असाल तर हे एकदा वाचा
Health benefits of fermented foods
नाश्त्यात सलग दोन आठवडे इडली, डोसा, मेदूवडा खाल्ल्यास शरीरावर नेमके काय परिणाम होतात? वाचा, डॉक्टर काय सांगतायत…

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की आरोग्या बाबतचा कोणताही मुद्दा किंवा जीवनशैलीबाबतचा एखादा सल्ला हा सरसकट सर्वांनाचा कसा काय लागू होऊ शकतो? मनुष्याची प्रकृती,त्याचे वय,त्याचा अग्नी (भूक,अन्नसेवन,पचनशक्ती व चयापचय), त्याचे बल, त्याच्या शरीराला होणारा व्यायाम, कामाचे-व्यवसायाचे स्वरुप… एकंदरच जीवनशैली आणि त्या वेळचा ऋतू, सभोवतालचे वातावरण आदि घटकांचा विचार न करता एकच एक सल्ला आंधळेपणे सर्वांनाच लागू करणे अयोग्य आणि अवैज्ञानिक आहे, हे आयुर्वेदाला मान्य नाही.

त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आदल्या रात्री सेवन केलेले अन्न पचले आहे का? हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे असते. आजच्या वेगवान जीवनामध्ये तुम्ही जेव्हा रात्री उशिरा जेवता व जेवणानंतर अर्ध्या-एक तासात झोपता, तेव्हा सकाळी उठल्यानंतर ते रात्रीचे जेवण पचलेले असण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच असे रात्री सेवन केलेले अन्नच जेव्हा पचलेले नसते,तेव्हा केवळ ’आधुनिक आहारशास्त्र’ सांगते, म्हणून सकाळी उठल्यानंतर ‘ब्रेकफ़ास्ट’ करणे योग्य नाही. कारण भूक नसताना केले जाणारे हे अन्नसेवन एक नव्हे विविध रोगांना आमंत्रण देणारे होऊ शकते.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात रक्तदाब वाढू शकतो!

अग्निमांद्य या मुद्याचा पावसाळ्याच्या अनुषंगाने विचार केल्यास तर सकाळी उठल्याउठल्या न्याहारी करणे योग्य नाहीच. पावसाळ्यातील त्रिदोषांचा प्रकोप आणि महत्त्वाचे म्हणजे अग्नीमांद्य (भूक व पचनशक्ती मंदावलेली)असताना केवळ आहारतज्ज्ञ सांगतात, म्हणून सकाळी उठल्यावर नाश्ता करणे योग्य नाहीच , उलट रोगांना आमंत्रक होईल. हिवाळ्यातल्या थंडीमध्ये अग्नी प्रखर असताना जेव्हा सकाळी उठल्या-उठल्या भूक लागते, तेव्हा सकाळी सकाळी इतर सोपस्कार सोडून सर्वप्रथम अन्नग्रहण करणे योग्य राहील, तसा सल्लाही आयुर्वेदाने हिवाळ्याच्या ऋतूचर्येमध्ये दिलेल आहे, मात्र पावसाळ्यामध्ये उठल्या-उठल्या अन्नसेवन करणे कदापि योग्य नाही.

पावसाळ्यात अग्नी मंद असतो, म्हणजे भूक व पचनशक्ती उत्तम नसते, त्यामुळे अशा अवस्थेत शरीराने ग्रहण केलेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे शरीराला पोषण देण्याऐवजी रोगकारक होण्याची शक्यताच जास्त. तसाही या दिवसांत अपचनाचा आणि अजीर्णजन्य विविध विकृती बळावल्याचा अनुभव येतो, तो भूक नसताना वेळीअवेळी अन्नसेवन केल्यामुळेच. याच कारणामुळे पावसाळ्याच्या या दिवसांत निदान पावसाळ्याच्या आरंभीच्या काही आठवड्यात तरी अन्नसेवन मर्यादेत करायला हवे, तसा सल्लाच आयुर्वेदाने दिलेला आहे की पावसाळ्यात अल्पाहारी व्हा. त्या सल्ल्याचे अनुसरण करण्यासाठीच तर या पावसाळ्यात इतके उपवास सांगितले आहेत. असे असतानाही सकाळी उठल्यावर अन्नसेवन करणे योग्य कसे ?

मतितार्थ हाच की पावसाळ्यात आपल्या भुकेचा अंदाज घेऊनच सकाळी कधी ‘ब्रेकफ़ास्ट’ करायचा,ते ठरवा.

Story img Loader