Lancet study says a third of India will be obese by 2050: २०५० पर्यंत भारतातील २१.८ कोटी पुरुष आणि २३.१ कोटी महिला लठ्ठपणाच्या शिकार असतील. एकूण ४४.९ कोटी किंवा लोकसंख्येच्या जवळजवळ एक तृतीयांश लोक लठ्ठपणानं त्रस्त असतील, असा अंदाज लॅन्सेटच्या एका नवीन अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. जागतिक स्तरावर, २०५० पर्यंत सर्व प्रौढांपैकी अर्ध्याहून अधिक आणि मुले आणि किशोरवयीन मुलांपैकी एक तृतीयांश मुलं जास्त वजनाचे किंवा लठ्ठपणाचे बळी पडतील, असे अभ्यासात म्हटले आहे. चिंताजनक बाब म्हणजे तरुणांमध्ये, पुरुषांमध्ये जास्त वजन किंवा लठ्ठपणाचे प्रमाण १९९० मध्ये ०.४ कोटींवरून २०२१ मध्ये १.६८ कोटींवर पोहोचले आणि २०५० पर्यंत ते २.२७ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तरुण महिलांमध्ये ही संख्या १९९० मध्ये ०.३३ कोटी, २०२१ मध्ये १.३ कोटींवरून वाढली आहे आणि २०५० मध्ये ती १.६९ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. पण, हा लठ्ठपणा का वाढत आहे? यावर काय उपाय करता येईल? या संदर्भात ओबेसिटी अँड मेटाबॉलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या वैज्ञानिक समितीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा