मुक्ता चैतन्य- संस्थापक, सायबर मैत्र
“ऑनलाईन कनेक्शन्स माणसा- माणसांतील संवादाला पर्याय असता कामा नयेत.” – युनेस्कोच्या डायरेक्टर जनरल ऑडेरी अझाऊले यांचं हे वक्तव्य आजच्या काळासाठी अतिशय महत्वाचं आहे. युनेस्कोचा ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग अहवाल प्रसिद्ध झाल्यावर त्यातल्या तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग या संदर्भातील विश्लेषणात त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. त्याचबरोबर युनेस्कोने सर्वच देशांना शाळेमध्ये मोबाईल बंदी आणावी असेही सुचवले आहे. हा प्रस्ताव योग्य असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. युनेस्कोच्या या रिपोर्टमध्ये शैक्षणिक धोरणे आखणाऱ्यांसाठी तंत्रज्ञानाला धरुन चार मूलभूत प्रश्न विचारले गेले आहे. तंत्रज्ञान वापरणं योग्य आहे का? सगळ्यांना सामान संधी मिळते का? किंवा ते न्याय्य आहे का?, मोजमाप करता येते का? टिकाऊ आहे का? हे प्रश्न उपस्थित करत असतानाच डिजिटल शिक्षणाची गरज आणि महत्त्वही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा