लंडन : दिवसाच्या २४ तासांपैकी १० तासांमध्येच अन्नपदार्थ खावे आणि उरलेल्या १४ तासांमध्ये उपवास करावा. असा उपवास केल्याने मूड, झोप, भूक यांमध्ये सुधारणा होते, असे ब्रिटिश वैद्यकीय तज्ज्ञांनी नव्या संशोधनानुसार दाखवून दिले आहे. तुमचे दररोजचे खाण्याचे वेळापत्रक दहा तासांपर्यंतच मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्याचे आरोग्यासंबंधी सकारात्मक फायदे होतात, असे या संशोधकांनी सांगितले. किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी युरोपीयन आहार पोषण परिषदेत हा संशोधन अहवाल सादर केला.

हेही वाचा >>> तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या….

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
sebi worry about sme ipo
विश्लेषण: ‘एसएमई आयपीओं’तील तेजी खुपणारी का? त्यावर सेबीची चिंता आणि उपाययोजना काय?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
Bhiwandi cosmetics marathi news
कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांची भिवंडीत विक्री
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?
health experts advise drummers for relief from permanent pain due to drumming
Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला

असंतत उपवास किंवा तुमच्या जेवणाचा वापर एका विशिष्ट वेळेपर्यंत मर्यादित ठेवणे ही वजन कमी करण्याची लोकप्रिय पद्धत आहे. या पद्धतीनुसार तुमचे दैनंदिन खाण्याचे वेळापत्रक १० तासांपर्यंत मर्यादित ठेवता येते आणि उर्वरित १४ तास उपवास करावा लागतो. उदाहरणार्थ जर तुम्ही सकाळी ९ वाजता पहिला घास घेतला असेल, तर संध्याकाळी सात वाजता त्या दिवसांतील अखेरचा घास तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर १४ तास काहीही खाणे टाळावे लागेल. या पद्धतीमुळे वजन कमी होते. मात्र ब्रिटिश संशोधकांच्या अहवालानुसार या पद्धतीमुळे मूड, झोप, भूक यांमध्येही लक्षणीय सुधारणा होते.