अन्न, वस्त्र व निवारा यांप्रमाणे आता स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे. घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड वाटून, मग ओढ लागते. पालकसुद्धा बाळाचे कौतुक म्हणून, तर कधी कधी नाईलाजाने त्याच्या हातात मोबाईल देतात. पण हळूहळू बाळ जसे मोठं होत जाते तसतसे त्याचे स्मार्टफोन अॅडिक्शन वाढत जाते. सध्या हीच गोष्ट अनेक पालकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे. मात्र, दुर्दैवी वस्तुस्थिती अशी आहे की, आपण सर्व जण आपल्या स्मार्टफोनमध्ये अडकलो आहोत. मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नसून, वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो. परंतु, या वाढलेल्या स्क्रीन-टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मग यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, जेव्हा मूल हट्ट करते किंवा रडते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात. मूल कधी कधी फोनवर व्हिडीओ स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना दिसतात. आधी पालकांकडे त्यांचा फोन देण्यासाठी हट्ट करणारी मुलं हळूहळू मग स्वत:चा वेगळा स्मार्टफोन मागविण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा मुलं त्यांच्या हट्टाखातर खाणं-पिणंही सोडून देतात. मात्र, आता एका ट्रिकमुळे मुलांचे फोनचे व्यसन अवघ्या सहा मिनिटांत सुटू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉक्टरांनी सांगितली ट्रिक

“एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, केवळ सहा मिनिटे वाचन केल्याने तणाव ६८ टक्क्यांनी कमी होतो. वाचन वाढवल्याने तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. परिणामत: अशा प्रकारे मोबाईलचे व्यसनही सुटू शकते.

ससेक्स विद्यापीठातील संज्ञानात्मक न्यूरो सायकॉलॉजिस्ट डेव्हिड लुईस यांनी केलेल्या २००९ च्या अभ्यासातून असेही निदर्शनास आणले आहे, “पुस्तक वाचन हे केवळ तुमची एकाग्रताच वाढवत नाही, तर तुमच्या सर्जनशीलतेलाही चालना देते.

बंगलोर येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे बालरोग न्यूरोलॉजी, सल्लागार डॉ. रवी कुमार सी. पी. यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी जास्त प्रमाणात फोन वापरण्याचे नकारात्मक परिणाम कसे कमी करायचे ते सांगितले आहे. “वाचन केवळ मनालाच चालना देत नाही, तर सकारात्मक विचार आणि आकलन कौशल्येदेखील वाढवते. त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि ज्ञानधारणेतही सुधारणा होते; जे शिक्षणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे दैनंदिन दिनचर्येमध्ये वाचन समाविष्ट करणे हा एक फायदेशीर पर्याय आहे, जो मानसिक आरोग्य सुधारण्यास प्रोत्साहन देतो.

हेही वाचा >> जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात

दिवसातून किती वेळ वाचन करावे?

एखाद्याने दररोज वाचनासाठी किती वेळ घालवला पाहिजे हे विचारले असता, डॉ. कुमार म्हणाले की, प्रत्येक दिवशी वाचनासाठी किती वेळ समर्पित केला पाहिजे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, फायदे मिळविण्यासाठी आपण दररोज किमान ३० मिनिटे ते एक तास वाचन करण्याचे लक्ष्य ठेवावे, अशी शिफारस केली जाते.

स्क्रीन टाइममध्ये वाचनाला प्राधान्य द्यावे. त्यांचा विश्वास आहे की, लोक तंत्रज्ञानाशी निरोगी नातेसंबंध जोपासू शकतात आणि एकाच वेळी त्यांची एकाग्रता आणि एकूणच संज्ञानात्मक क्षमता वाढवू शकतात, छंद जोपासू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This hack might help break your phone addiction in just 6 minutes increase concentration by 68 percent srk