Fasting: उपवास हा भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि प्राचीन काळापासून तो पाळला जातो. त्यामुळे मानवी शरीराला जशी भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्नाची गरज असते; तसेच या शरीरात दीर्घकाळ भूक सहन करण्याची ताकददेखील असते. अनेक तास आपले शरीर काहीही न खाताही सुदृढ राहू शकते. परंतु, हळूहळू काहीही न खाल्ल्यामुळे गंभीर शारीरिक बदल होऊ शकतात.

डॉ. पल्लेटी शिवा कार्तिक रेड्डी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “जेव्हा आपण सलग तीन दिवसांहून अधिक दिवस काहीही खात नाही तेव्हा तुमच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होतात. सुरुवातीला तुमचे शरीर ऊर्जेसाठी साठवलेले ग्लुकोज वापरते. पहिल्या २४ तासांत हे ग्लायकोजेन संपुष्टात येते. मग तुमचे शरीर ग्लुकोनोजेनेसिस सुरू करते आणि अमिनो अॅसिडसारख्या नॉन-कार्बोहायड्रेट स्रोतांपासून ग्लुकोज तयार करते.”

really fasting between 5.30 pm and 10 am is best for belly fat loss
सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती
Wisdom tooth extraction recovery tips after operation expert advice
जर तुम्हालाही अक्कलदाढ असेल, तर हे वाचाच…, तज्ज्ञांनी सांगितले अक्कलदाढ काढल्यानंतर २४ ते २८ तास काय करावे…
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Here what happens to the body when you finish meals in less than 10 minutes
तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा….
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
This is what happens to fat loss goals when you have just two eggs for breakfast daily
दररोज नाश्त्याला दोन अंडी खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होईल? वजन कमी करत असाल तर हे एकदा वाचा

डॉक्टरांनी सांगितले की, दुसऱ्या दिवसापर्यंत तुमच्या शरीरात केटोसिस सुरू होते आणि साठलेल्या चरबीचे विघटन करण्यास सुरुवात करते.

शरीराचे चयापचय कशा प्रकारे जुळवून घेते?

डॉ. रेड्डी यांनी सांगितले, “जसजसे आपल्या उपवासाचे दिवस वाढतात, तसतसे शरीर तुमची चयापचय, इन्सुलिनची पातळी कमी करून आणि नॉरपेनेफ्रिनची पातळी वाढवून अनुकूल होते. त्यामुळे इन्सुलिनमधील कमतरता भरून काढणे, मूत्रपिंडातून जास्तीचे मीठ व पाणी बाहेर टाकण्यासदेखील मदत होते. बहुतेकदा पाणी कमी झाल्यामुळे वजन कमी होते.”

तीन दिवसांमध्ये नॉरपेनेफ्रिनच्या वाढीमुळे तुमची चयापचय प्रक्रिया तात्पुरती वाढू शकते; परंतु शेवटी ऊर्जा वाचवण्यासाठी त्याची गती मंद होईल. कारण- शरीर अन्नाच्या कमतरतेशी जुळवून घेते.

७२ तासांच्या उपवासाचे तोटे आणि फायदे

डॉ. रेड्डी यांच्या मते तीन दिवस कोणतेही अन्न न खाण्याशी संबंधित अनेक फायदे आणि तोटे आहेत.

हेही वाचा: पनीर बनवण्यासाठी दही, लिंबू की व्हिनेगर काय वापरणं योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

उपवासाचे फायदे

१. निरोगी पेशींची निर्मिती

ऑटोफॅजी ही एक सेल्युलर क्लीनअप प्रक्रिया आहे; जी खराब झालेल्या पेशी शरीरातून काढून टाकते आणि नवीन निरोगी पेशी पुन्हा निर्माण करते.

२. वजनात घट

उपवास केल्याने वजन कमी होऊ शकते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीदेखील कमी होण्यास मदत होते.

उपवासाचे तोटे

१.निर्जलीकरणाचा धोका

शरीराला कोणत्याही प्रकारे पाणी न मिळाल्यास निर्जलीकरणाचा धोका संभवतो. तो धोका टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

२. रक्तातील साखरेत घट

उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी या समस्या उदभवतात.

३. निद्रानाश

पोटात अन्न नसल्याने त्याचा परिणाम झोपेवरही पाहायला मिळतो. उपवासामुळे झोप येत नाही. त्यामुळे थकवा, चिडचिडदेखील होते.

Story img Loader