Why is it important to avoid getting wet in the rain: अनेकांना पावसात भिजायला आवडते. पावसाळा सुरू झाला की इच्छा असो किंवा नसो, आवडत असो किंवा नसो अनेकदा आपल्याला पावसात भिजावे लागते. कोरडे राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुसळधार पावसासमोर आपले काहीही चालत नाही. अनेकदा पाणी साचलेल्या रस्त्यातून नागरिकांना ये-जा करावी लागते किंवा वाहतूक कोंडीमुळे रस्ते ठप्प होतात, अशावेळी लोक बराच वेळ पावसात भिजतात.
थोड्याशा पावसात भिजल्याने फारसा त्रास होत नसला तरी बराच वेळ ओल्या स्थितीत राहिल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुरणजीत चॅटर्जी यांनी पावसात भिजण्याबाबत चेतावणी दिली आहे. “पावसात भिजल्यानंतर व्यक्ती बराच वेळ ओल्या कपड्यांमध्ये राहिल्यास ते शरीरातील उष्णता काढून टाकते आणि शरीराच्या तापमानाचे नियमन करण्याची क्षमता धोक्यात येते, ज्यामुळे हायपोथर्मियाचा (hypothermia) धोका वाढतो. असामान्यपणे शरीराचे तापमान कमी झाल्यास ही स्थिती उद्भवते, ज्यामध्ये रुग्णाला हुडहुडी भरते, तो गोंधळतो. तसेच काही गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो, असेही डॉ. चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा