दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत. दूध आणि फळे एकत्र खाऊ नयेत, मध खाल्ल्यानंतर गरम पाणी पिऊ नये अशा कित्येक सूचना आपल्याला वडीलधाऱ्यांकडून दिल्या जातात, पण त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का? नाही ना…; केला असेल तरी कित्येकदा वडीलधाऱ्यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता येत नाही. पण, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, या सर्व गोष्टींमध्ये शास्त्रीय कारण आहे. होय, आपण जे काही अन्न खातो, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. प्रत्येक अन्नपदार्थाची चव वेगळी असते, त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि त्यातून मिळणारे पोषकतत्वंही वेगळी असतात. यापैकी काही पदार्थ असतात, जे एकत्रित खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यास लाभ होतो, तर काही पदार्थ असे असतात, जे एकत्रित खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. होय, जे खाद्यपदार्थ एकत्रितपणे सेवन केल्यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात, त्याला विरुद्ध आहार असे म्हणतात. एवढेच नाही, तर काही पदार्थ आपण कधी खातो, किती प्रमाणात खातो, कसे खातो, कोणत्या पदार्थांबरोबर खातो याचेही काही नियम आहेत. या नियमांविरुद्ध जाऊन जे अन्न आपण खातो, त्याला आपण विरुद्ध आहार म्हणू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा