आरोग्य आणि तंदुरुस्त राहण्याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. या गैरसमजामुळे लोक नकळतपणे आरोग्यासाठी योग्य नसलेल्या मार्गाचा अवलंब करतात. असाच एक गैरसमज जो गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून आहे तो म्हणजे, ‘नाश्ता करणे ही वजन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. पण, हे प्रत्येक व्यक्तीच्या चयापचयाच्या शक्तीवर अवलंबून आहे”, असे मत मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना व्यक्त केले आहे.

सकाळी नाश्ता का करावा?

नाश्ता करणे आणि वजन नियंत्रित करणे यामधील संबंध अनेक अभ्यासातून सिद्ध झाले, ज्यामध्ये नाश्ता न केल्याने विविध प्रकारचे परिणाम शरीरावर होऊ शकतात, हे समोर आले आहे. सकाळी नाश्ता करण्यामागे असा सामान्य तर्क आहे की, ‘दिवसाच्या पहिल्या टप्प्यात अन्नाचे सेवन केल्याने जास्त वेळ पोट भरलेले राहते आणि दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला भूक लागत नाही. ‘तुम्ही दिवसभर पुरेल इतक्या कॅलरीजचे सेवन केल्यानंतर जास्त अन्न खाऊ नये, जेणेकरून तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता.

slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
dragon drones
रशिया-युक्रेन युद्धात वापरण्यात येणारे नवीन शस्त्र ‘ड्रॅगन ड्रोन’ काय आहे?
workout pills
Workout Pill: आता जिमला जाण्याची चिंता मिटणार? व्यायामाची गोळी हा काय प्रकार आहे?
The ultimate vitamin cheat sheet: Top foods packed with vitamins A to K for better health
केस गळतात? चिडचिड होते? ‘या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता; कोणते व्हिटॅमिन्स शरीरात काय काम करतात? घ्या जाणून…
Natural Ways To Dissolve Gall bladder Stones
पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
ST employees and officers
बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…

नाश्ता न केल्यास व्यक्ती दिवसभरात जास्त प्रमाणात खातो का?

नाश्ता न केल्यास दिवसभरात जास्त प्रमाणात अन्न खाल्ले जाते, हा सामान्य समज सर्वांच्या बाबतीत लागू होत नाही. मानवी शरीर ही एक क्लिष्ट रचना आहे आणि प्रत्येक व्यक्तीची चयापचय प्रक्रिया आणि पचनाची प्रवृत्ती वेगळी असते. एका व्यक्तीसाठी जी गोष्टी फायदेशीर ठरू शकते ती दुसऱ्यासाठी तितकी फायदेशीर असणार नाही.प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होणाऱ्या वैयक्तिक फरकांना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे, पोषणासाठी अधिक वैयक्तिकृत दृष्टिकोन (a more personalized) स्वीकारणे ही मुख्य गोष्ट आहे.

हेही वाचा – सलग तीन दिवसांच्या उपवासाचा तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम?

प्रत्येक व्यक्तीची चयापचय आणि पचनक्रिया वेगवेगेळी असते
भिन्न व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे अन्न पचवतात आणि एकाच प्रकारच्या पौष्टिक आहारासाठी त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. काही लोकांना असे वाटते की, दिवसातील पहिले जेवण अथवा नाश्ता वगळल्याने त्यांच्या पचनसंस्थेला फायदा होतो, तर इतरांना नाश्ता केल्यामुळे चयापचय क्रियेत सुधारणा होण्यास मदत होते. नाश्त्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यापेक्षा, लोकांनी त्यांच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांच्या शरीराचे जैविक वेळापत्रक (circadian rhythms) लक्षात घेऊन त्यानुसार पूरक खाण्याच्या सवयी विकसित केल्या पाहिजेत.

नाश्ता न करणे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकत नाही

कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे आढळून आले की, नाश्ता न करणारे लोक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जास्त खात नाहीत आणि त्याऐवजी ते दिवसभरात सुमारे ४०० कमी कॅलरी खातात. म्हणून न्याहारी वगळणे तुम्हाला मधुमेह नसल्यास मदत करू शकते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची वाढ आणि विशिष्ट आरोग्य परिस्थिती टाळण्यासाठी अन्नाचे विभाजन करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, शरीराला अन्नाची गरज असल्यास ते तुम्हाला आठवण करून देईल आणि लवकर नाश्ता करताना असे होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येते.

हेही वाचा – पेपा पिग’, ‘कोको मेलन’ आणि ‘कार्टून मॅरथॉन’ पाहण्यामुळे तुमची मुलं ‘zombie’ झाली आहेत का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

चयापचय सुधारण्यासाठी काय आवश्यक आहे?

जर तुम्हाला चयापचय प्रक्रिया वाढवायची असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, “नाश्ता वगळणे किंवा नाश्ता वगळल्याने वापरलेल्या कॅलरींच्या संख्येवर कोणताही परिणाम होत नाही.” चयापचयासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात खाल्लेले एकूण अन्न, शरीराला आवश्यक असलेली कॅलरीची पूर्तता आणि शरीर वापरत असलेल्या कॅलरी तुम्ही कोणत्या वेळी किंवा किती वेळा खाता याने काही फरक पडत नाही. फॅट-स्टोअरिंग एंजाइमामुळे (Fat-storing enzymes) चयापचय न होण्याची समस्या वाढते, म्हणून शरीराची ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे.

शरीर वापरत असलेल्या कॅलरीजची संख्यादेखील तुमची शारीरिक हालचाल आणि तुम्ही स्नायू (muscle mass) तयार केले आहेत की नाही, यावर अवंलबून असते. फॅट्सपेक्षा स्नायू जास्त कॅलरीज वापरतात.

इंटरमिटेंट फास्टिंगचे परिणाम सिद्ध झाले आहेत

अलीकडेच इंटरमिटेंट फास्टिंगची संकल्पना लोकप्रिय झाली आहे, ज्याने पारंपरिक तीन वेळच्या जेवणाच्या दिनचर्येला आव्हान दिले आहे. यामध्ये लोक खाण्यात ठराविक काळाचा ब्रेक घेतात आणि बराच वेळ उपाशी राहतात. यासाठी १६.८ हा फॉर्म्युला वापरला जातो. त्यानुसार तुम्हाला १६ तास उपवास करायचा आणि ८ तासांनंतर खायचे-प्यायचे. या उपवासामध्ये खाण्याच्या वेळेवर मर्यादा घालणे आणि उपवासाचा कालावधी स्वीकारणे, काही लोकांना त्यांचे वजन नियंत्रित करण्यात आणि एकूणच बरे वाटण्यास मदत करू शकते. इंटरमिटेंट फास्टिंग करत असताना तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल तर तुमचे वजन हळूहळू कमी होऊ शकते. याचे कारण असे की, “जेव्हा जास्त कालावधीसाठी अन्न सेवन केले जात नाही, तेव्हा १६ तासांचा उपवासाचा कालावधी फॅट्स कमी करण्यास प्रोत्साहन देऊ शकतो.”ॉ

हेही वाचा – ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते का? संशोधनाबाबत काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या 

नाश्त्याच्या वेळी अन्नाचे अतिसेवन करू शकता
काहीवेळा, दिवसभर ऊर्जा टिकवण्याच्या नादात, भूक नसतानाही तुम्ही नाश्त्याच्यावेळी जास्त अन्न खाऊ शकता आणि साखरेने भरलेला एक मोठा ग्लास ज्यूस किंवा एक कप कॉफी आणि टॉपिंगमध्ये जास्त कॅलरीज खाता.