मधुमेह हा असा गंभीर आजार आहे, जो कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार मधुमेहाला कारणीभूत घटक आहेत. आहारात जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढतेय. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर क्रियाशील ठेवत आहारावर नियंत्रण ठेवावे. काही लोक आहारात कमी गोड आणि फॅट नसलेले पदार्थ खातात, शरीर सक्रिय ठेवतात तरीही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही. अशा वेळी ते डॉक्टरांचा सल्ला घेतात, तेव्हा त्यांच्या आहारात ते शरीरास धोकादायक ठरणारे स्नॅक्स खात असल्याचे समोर येते. यात डायजेस्टिव्ह बिस्किट्स नाश्त्यासाठी खातात. याबाबत ‘मॅक्स हेल्थकेअर’चे एंडोक्रिनोलॉजी ॲण्ड डायबिटीजचे चेअरमन डॉ. अंबरीश मिथल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात कोणते पदार्थ खावेत आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कसे नियंत्रणात ठेवावे याबाबत सल्ला दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा