नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणे हे मन आणि शरीराच्या शुद्धीकरणासाठी चांगले मानले जाते. पण दातांच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही.कारण तुम्ही जे काही खातात त्याचा थेट संबंध तोंड आणि दातांच्या आरोग्याशी येतो. नवरात्रीमध्ये, बहुतेक भक्त एकतर काहीही खात नाहीत किंवा उपवास करताना फक्त फळांचा आहार घेतात. तसेच फलाहारमध्ये फळे आणि फळांचा ज्यूस याचे जास्त सेवन केले जाते. बहुतेक लोकं फळांचा आहार घेतात. जास्त प्रमाणात फळं खाल्ल्याने त्याचा तोंडाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बराच वेळ उपवास केल्याने तोंड आणि दातांमध्ये समस्या निर्माण होतात. तर यावेळी दंत शल्यचिकित्सक डॉ. नितिका मोदी यांनी उपवासाच्या दिवसांमध्ये तोंडाच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेतली पाहिजे, असे संगितले. त्याचबरोबर त्यांनी संगितले की उपवासाच्या दिवसांमध्ये लोकं जास्त फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करू लागतात. फळांबरोबरच रस, सरबत, खीर, हे पदार्थ लोकांना उपवास करताना आवडतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा