स्वयंपाकात मीठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव, सुंगध येत नाही. मीठ नसेल तर कोणताही पदार्थ बेचव लागतो. पण अनेकदा भाजी किंवा डाळी बनवताना तुमच्या हातून चुकून जास्त मीठ पडतं, कधी कधी लक्ष नसल्यामुळे तुम्ही एखाद्या पदार्थांमध्ये दोन वेळा मीठ टाकता. ज्यामुळे भाजी प्रमाणापेक्षा जास्तच खारट होते आणि ती खाण्यायोग्यही राहत नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. पण आता काळजी करु नका. खाली दिलेले तीन उपाय फॉलो करुन तुम्ही खारट भाजी देखील खूप चविष्ट बनवू शकता, हे उपाय कोणते जाणून घेऊ….

भाजीमध्ये मीठ जास्त पडल्यास काय करावे?

१) उकडलेले बटाटे टाका

भाजीमध्ये मीठ जास्त पडले तर त्यात थोडे उकडलेले बटाटे टाका. यामुळे बटाटे भाजीतील मीठ शोषून घेईल. उकडलेल्या बटाट्यामध्ये जास्त स्टार्च असते आणि ते मीठ जलद शोषण्यास सुरवात करते. म्हणून एक उकडलेला बटाटा घ्या, त्याचे बारीक तुकडे करा आणि ते भाजी किंवा भाजीच्या ग्रेव्हीमध्ये टाका. कच्चा बटाटा वापरला असेल तर तो भाजीत २० मिनिटे शिजू द्या.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

२) तूप आणि थोडे पाणी टाका

एखादी भाजी खूप जास्त खारट नसेल तर त्यात तुम्ही १ चमचा तूप आणि थोडे पाणी मिक्स करा. मग ती पुन्हा उकळी येईपर्यंत शिजवा. यामुळे भाजीतील मीठाची चव कमी होईल आणि तुम्ही ती आरामात खाऊ शकाल.

३) पिठाचा गोळा टाका

भाजी अथवा डाळ खारट झाली असे तर त्यात मळलेल्या गव्हाच्या पिठाचे गोळे टाकू शकता, पिठाचे हे गोळे मीठ शोषून घेईल. यासाठी गोळे टाकल्यानंतर भाजी किंवा डाळ थोडा वेळ उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा. मीठाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमची ग्रेव्ही अथवा डाळ पुन्हा खाण्यासाठी योग्य होईल.

४) ब्रेड वापरा

ब्रेड कोणताही द्रव पदार्थ पटकन शोषून घेते. जेव्हा भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तेव्हा त्यात ब्रेड टाका, ज्यामुळे मीठ शोषून घेतले जाईल. यामुळे भाजी जास्त घट्ट झाली तर त्यात पाणी घालून ती पुन्हा उकळवा. या पद्धतींने तुम्ही भाजीतील मीठाचे प्रमाण कमी करु शकता.

Story img Loader