पावसाळा सुरू झाल्यावर आजारांचा धोका वाढतो. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळेच खाण्यापिण्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. या ऋतूत स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा, तसेच हंगामी आजार टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेऊया.

पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. या ऋतूमध्ये शिंका येणे, खोकला, जुलाब आणि पोटात संसर्गाची प्रकरणे सर्वाधिक आढळतात. काहींना तापही येतो. हे टाळण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घ्यावा. अधिकाधिक पाणी प्यावे आणि स्वतःला हायड्रेट ठेवावे. यासाठी आवळा, लिंबूपाणी, नारळपाणी आणि कोरफडीचा रस घ्यावा.

bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Top 10 Kitchen Hacks
भाजीसाठी परफेक्ट ग्रेव्ही करायची आहे? कुकरमधून पाणी उतू जातेय? फ्रिजमध्ये दुर्गंध येतो? यासह किचनमधील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवा एका क्लिकवर
Does Eating Ghee Really Make You Fat
Eating Ghee Increases Obesity : तुपाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

Photos : मुलींना आईकडून वारशामध्ये मिळते Anxiety; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

या ऋतूत स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी, कोमट पाण्यात मीठ घालून स्वच्छ करा. तीन तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाऊ नये. केळी, पपई, ताजा रस यांचे सेवन येईल. रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि पॅकबंद वस्तू खाणे टाळा, तसेच हात वारंवार चांगले धुवा.

न्याहारीमध्ये तृणधान्ये, डाळ, दही, मुगाच्या डाळीचे थालीपीठ किंवा फ्रूट चाट यांचा समावेश करू शकता. नाश्त्यात तेलकट खाणे टाळावे. दुपारच्या जेवणात चपाती, मसूर, भाज्या, दही, कोशिंबीर घ्या. फायबर, प्रथिने, पोषक तत्वे, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. रात्रीच्या जेवणात नेहमी हलक्या आणि सहज पचणाऱ्या गोष्टी खाव्यात. रात्रीच्या जेवणात तुम्ही खिचडी, डाळ आणि दही खाऊ शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader