उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी, भगर, फळे खाऊन कंटाळा यायला लागतो. मग उपवासाला वेगळे पदार्थ काय करायचे असा प्रश्न घरातील महिलांना पडतो. ८ दिवसांत काही वेगळे पदार्थही करुन झालेले असतात. पौष्टीक आणि अगदी कमी वेळात होईल असा एक हटके पदार्थ. साहित्य : दोन वाटी राजगिरा पीठ, जिरेपूड दोन चिमटी, चवीपुरते तिखट, मीठ, एक लहान चमचा मोहन, थोडेसे आले वाटण, तूप कृती : तूप सोडून इतर सर्व जिन्नस एकत्रित चांगले मळून घ्या. हे पीठ थोडा वेळ भिजू द्या. कढईत तूप गरम करा. पिठाच्या लहान लहान पुऱ्या लाटून किंवा हातावर थापून तळून घ्या. उपवासाच्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर गरम पुऱ्या अतिशय चविष्ट लागतात.