नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरात ३० कोटींपेक्षा अधिक लोक नैराश्यासारख्या समस्येने ग्रस्त आहेत. तर, मानसिक आरोग्यासंबंधी भारतासह नऊ देशांत करण्यात आलेल्या संशोधनानुसार अल्पशिक्षितांना नैराश्य, चिंता, एकटेपणा अशा समस्यांनी अधिक प्रमाणात विळखा घातला आहे. हे संशोधन नुकतेच ‘मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड सोशल एंक्युजन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

‘ब्रिटन युनिव्‍‌र्हसिटी ऑफ इस्ट एंग्लिमा’च्या संशोधनानुसार अशिक्षित किंवा अल्पशिक्षित महिलांमध्ये अशा व्याधींचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या ५० वर्षांत साक्षरतेचे प्रमाण वाढले असले तरी जगभरात ७० कोटी ७३ लाख लोक अद्यापही अशिक्षित आहेत. विकसनशील आणि संघर्षांचा इतिहास असलेल्या देशांत साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. 

School students bag, School students,
दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या १५ टक्केपेक्षा जास्त नको…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
Zika cases continue to rise in Pune More pregnant patients
पुण्यात झिकाने पुन्हा काढले डोके वर! रुग्णसंख्येत वाढ सुरूच; रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
dengue-malaria in Bhayander number of patients quadrupled within a month
पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण

संशोधकांनी सांगितले की, सुशिक्षित व्यक्तीची कमाई अधिक असते. ते चांगला आहार घेतात. त्यांचे राहणीमानही चांगले असते. अशा व्यक्तींची सामाजिक स्थिती सुधारते. परंतु शिक्षणापासून दूर असलेल्या व्यक्ती मागे पडतात. त्या गरिबीमध्ये अडकतात. त्या गुन्हेगारीतही अडकण्याची शक्यता वाढते. संशोधकांनी शिक्षण आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधांची माहिती घेण्यासाठीच्या प्रयोगात सुमारे २० लाख लोकांना सहभागी केले होते. त्यावेळी अल्पशिक्षित किंवा अशिक्षित लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले.