बाजरातून आपण ताज्या भाज्या वा फळे घेऊन येत असतो. परंतु, या भाज्या घरी आणल्यानंतर ताज्या कशा राहतील याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. विशेषतः स्वयंपाकात आपल्याला सतत कांदे आणि बटाटे लागत असतात. त्यामुळे या दोन्ही भाज्या आपण मोठ्या प्रमाणात घरी आणून ठेवतो. परंतु, बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन किंवा इतर काही कारणामुळे या भाज्या लवकर खराब होण्यास सुरुवात होते. एखादा बटाटा खराब झाला की, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर सर्व भाज्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्या टोपलीमध्ये त्यासोबत ठेवलेल्या इतर सर्व भाज्याही खराब होऊ लागतात.

असे होऊ नये यासाठी मास्टरशेफ इंडियाच्या पहिल्या पर्वाच्या विजेत्या शेफ पंकज भदोरिया यांनी काही उपयुक्त टिप्स आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करून दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी भाज्या योग्य प्रकारे कशा साठवून ठेवाव्यात याबद्दल उपयुक्त अशी माहिती दिली आहे. ती काय आहे ते पाहा.

milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
article about weakness problem in wome causes of weakness in women
स्त्री आरोग्य : बायांनो, तुम्हाला विकनेस जाणवतो?
police arrest five for killing 28 year old man in pimpri chinchwad
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून
sleep relation with health
Health Special: निवांत झोप आणि आरोग्याचं नातं

हेही वाचा : भांडी आवडली म्हणून उगाच पैसे खर्च करू नका; स्वयंपाक घरातील वस्तू घेण्याआधी ‘या’ पाच टिप्स पाहा

कांदे-बटाटे जास्त काळ चांगले ठेवण्यासाठी पाहा हे करून…

१. भाज्या वेगवेगळ्या ठेवा

सर्वसामान्यपणे आपण कांदे आणि बटाटे बाजारातून आणल्यानंतर ते एकाच टोपलीमध्ये ठेवतो आणि हेच या दोन भाज्या पटकन खराब होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. पंकज यांच्या म्हणण्यानुसार- बटाट्यांमधून एक विशिष्ट प्रकारचा गॅस बाहेर पडत असतो. अशा वेळेस कांदेही बटाट्यांसोबत असतील, तर ते लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दोन्ही भाज्या वेगवेगळ्या ठेवणे गरजेचे असते.

२. टोपल्यांची निवड

सहसा भाज्यांसाठी प्रत्येकाच्या घरात डबे, ट्रे किंवा टोपली ठेवलेली असते. बाजारात जाऊन जर भाजी आणली, तर कधी कधी ती घरी आल्यानंतर पिशव्यांमध्ये राहते. किंवा जर भाज्या ऑनलाइन मागवल्या असतील, तर भाज्यांसोबत त्याच्या कागदी पिशव्यादेखील येतात. अशा वेळेस आपण थोडा आळस करतो आणि आलेल्या सर्व भाज्या त्याच कागदी पिशव्यांमध्ये ठेवून देतो. तर काही जण सरसकट सर्व गोष्टी फ्रिजमध्ये ठेवून देतात. या लहान चुकांमुळेसुद्धा कांदे-बटाटे खराब होऊ शकतात.
त्यामुळे कांदे-बटाटे ठेवण्यासाठी हवा खेळती राहील अशा जाळीदार टोपल्यांची निवड करावी.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या @masterchefpankajbhadouria या अकाउंटवरून शेफ पंकज यांनी या सोप्या; पण उपयुक्त अशा टिप्सचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला सुमारे सहा लाख ३८ हजार इतके व्ह्युज मिळाले आहेत.