तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली म्हणजेच पीआरएस दररोज ६ तास बंद राहणार आहे. पुढील ७ दिवस रात्री ६ तास पीआरएस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने कोरोनापूर्व काळात परत आणली जाईल आणि त्यासाठी प्रवासी आरक्षण व्यवस्थेत काही बदल करणे आवश्यक आहे.

प्रवासी आरक्षण व्यवस्था कधीपासून बंद राहणार?

१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील सात दिवस ट्रेनच्या तिकीट बुकिंगवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. निवेदनानुसार, १४ आणि १५ नोव्हेंबर ते २० आणि २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवासी आरक्षण प्रणाली प्रभावित होईल. दुपारी ११:३० ते पहाटे ०५:३० या सहा तासांसाठी प्रवाशांना तिकीट काढता येणार नाही.

स्पेशल ट्रेन्स आणि स्पेशल भाडे संपले, करोनाच्या आधी प्रमाणे धावतील ट्रेन

विशेष म्हणजे, कोरोनाचा प्रभाव कमी होताच, रेल्वे बोर्डाने रेल्वेगाड्या पुन्हा कोरोनापूर्वीच्या स्थितीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांत सर्व गाड्या सामान्य क्रमांकाने धावू लागतील, म्हणजेच आकड्यांमधून शून्य काढून टाकले जाईल. याशिवाय काही गाड्यांमध्ये स्पेशल क्लास घेतल्यानंतर भाडे वाढवण्यात आले, तेही पूर्वीप्रमाणेच असेल.ट्रेनमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. आरक्षणाशिवाय प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय प्रवासादरम्यान ब्लँकेट आणि चादरी दिली जाणार नाहीत.

Story img Loader