कुठलेही काम करण्यासाठी उत्साहाची आणि इच्छेची गरज असते. या गोष्टी असल्यास काम पूर्णत्वास न्यायला सोपे जाते. काम करताना आनंदही वाटतो. मात्र कधी कधी हेच काम करायला अवघड होते. कामाचा वेग मंदावतो आणि याने तुमच्या कामगिरीवर फरक पडू शकते. कामाच्या आड कंटाळा आल्यास ते करणे कठीण होऊन बसते. केवळ कामच नव्हे, कंटाळा आल्याने कोणाशी बोलण्याची देखील इच्छा होत नाही. अधिक काळ कंटाळवाणे वाटणे मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे, वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. तर चला आधी कंटाळा येण्याची कारणे कोणती याबाबत जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कारणांमुळे येतो कंटाळा

हातात काम नसल्यास कंटाळा येतो. तसेच, अनेकदा एकच काम वारंवार केल्याने देखील कंटाळा येतो. कारण वारंवार ते काम केल्याने त्यातील आवड कमी होत जाते.

कंटाळा दूर करण्यासाठी ‘हे’ करा

घरातच राहिल्याने कंटाळवाणे वाटू शकते. त्यामुळे ताजेतवाने वाटण्यासाठी तुम्ही नव्या ठिकाणी फिरून या. याने तुमचा कंटाळा दूर होईल आणि नवीन ठिकाणी फिरताना आनंदी वाटेल. तुम्ही आपल्या मित्रांना सोबत घेऊन जा. त्यांच्यासोबत राहून, गप्पा करून तुम्हाला निरस वाटणार नाही.

मित्रांसोबत खेळा

कंटाळा घालवण्यासाठी तुम्ही खेळ खेळू शकता. आपल्या मित्रांसोबत खेळ खेळा. याने कंटाळा तर जाईलच सोबत व्यायाम देखील होईल. व्यायाम हा शरीरासाठी फायदेशीर आहे. खेळल्यानंतर आलेल्या थकव्याने तुम्हाला चांगली झोप येईल. चांगली झोप घेऊन उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल.

गॅजेट्सचा वापर

एरव्ही लोक मोठ्या प्रामाणात मोबाईल, लॅपटॉपवर आपला वेळ घालवत आहे. दीर्घकाळ या उपकरणांना वेळ देणे आरोग्याला अपायकारक आहे. मात्र, थोडा वेळ त्यांचा वापर केल्यास तुमचा कंटाळा दूर होऊ शकतो. पण या उपकरणांचा वापर फार कमी केला पाहिजे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to overcome boredom to keep body healthy and feel fresh ssb